Join us  

'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिका उत्कंठावर्धक वळणावर, अखेर खरी गौरी येणार सर्वांसमोर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 11:55 AM

Sukh Mhanje Nakki Kay Asata: 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत एकीकडे शालिनीचे डावपेच सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. आता माई, गौरी आणि जयदीपसमोर नवं सकंट उभं राहणार आहे.

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. एकीकडे शालिनीचे डावपेच सुरु असताना गौरीदेखील खंबीरपणे या डावपेचांचा सामना करत आहे. आता माई, गौरी आणि जयदीपसमोर नवं सकंट उभं राहणार आहे. महिला मंडळाने शिर्केपाटलांच्या घरावर मोर्चा आणला आहे, त्यामुळे जयदीप मानसीसोबत लग्न करण्यासाठी होकार देतो. आता हे लग्न थांबवण्यासाठी गौरी तिचं खरी गौरी असल्याचे सत्य सांगणार आहे.

नुकत्याच प्रसारीत भागात पाहायला मिळालं की, महिला मंडळ शिर्केपाटलांच्या घरावर मोर्चा आणतात. माईंची प्रतिमा जाळणार असतात. मात्र जयदीप त्यांना असे करू नका मी लग्नासाठी तयार असल्याचे सांगतो. त्यानंतर मानसी आणि तिची आई लवकरचा मुहूर्त काढतात. लग्नासाठी होकार दिल्यामुळे माई जयदीपवर चिडतात. तर गौरीदेखील नाराज होते. त्यानंतर माई गौरीला सांगतात की आता हे लग्न थांबवण्यासाठी खऱ्या गौरीला सर्वांसमोर यावे लागेल.

नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतंचा नवा प्रोमो समोर आला आहे. त्यात पाहायला मिळतं आहे की, मानसी आणि जयदीपचे लग्नाचे विधी सुरू असताना माई लग्नमंडपात येऊन जयदीपला बोलतात की पहिली बायको जिवंत असताना दुसरे लग्न तू करू शकत नाही. त्यावर शालिनी बोलताना दिसते आहे की, कुठे आहे आपली खरी गौरी? त्यावर माई म्हणतात की तुम्हा सगळ्यांसमोर. त्यानंतर गौरी बोलते मीच आहे खरी गौरी. हे ऐकल्यावर जयदीप बोलतो की हीच जर खरी गौरी असेल तर मी हे लग्न करू शकत नाही. त्यामुळे मालिकेत आता खरी गौरी समोर आल्यानंतर शालिनी आणि मानसी काय करतात आणि जयदीप आणि मानसीचं लग्न होईल का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.  

टॅग्स :स्टार प्रवाह