Join us  

'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर, अभि-अनघाच्या साखरपुड्यात विघ्न; अंकिता करते आत्महत्येचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 3:46 PM

आई कुठे काय करते मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे.

आई कुठे काय करते मालिका उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहचली आहे. देशमुख कुटुंब मुंबई सोडून गावातल्या घरी राहायला आले आहेत आणि तिथेच अभिषेक अनघाचा साखरपुडा पार पडणार होता. सर्व देशमुख कुटुंब आनंदी असताना त्यांच्या आनंदावर विरजन पडते आणि तेही संजनामुळे. त्यामुळे अभि-अनघाच्या साखरपुडा पार पडला नाही. त्यामुळे आता अभि अंकिताशी लग्न करणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अभि आणि अनघाचा साखरपुडा पार पडत असतो. देशमुख कुटुंब आनंदात असते. सगळे या आनंदाच्या क्षणी नाचतात-गातात. सर्व काही सुरळीत पार पडत असते. अनघा अभिच्या बोटात अंगठी घालते. अभि अनघाच्या बोटात रिंग घालत असताना अंकिताचा अभिला फोन येतो. अनघा त्याला फोन उचलायला सांगते. अभि फोन उचलतो तेव्हा समजते की अंकिता आत्महत्येचा प्रयत्न करते. हे ऐकताच अभि साखरपुडा सोडून अंकिताकडे जायला निघतो. या सर्व प्रकारमुळे घरातल्यांना आणि अनघाच्या घरांतल्यांना धक्का बसतो.

अरुंधती संजनाला अंकिताशी फोनवर बोलताना ऐकते त्यामुळे ती संजनाला विचारते की तू अंकिताला साखरपुड्याबद्दल सांगितलेस का, त्यावर संजना सांगते की अंकिता खूप रडत होती म्हणून मी तिला साखरपुड्याबद्दल सांगितले. संजनाच्या या कारस्थानाविषयी कळताच अरुंधतीने माझ्या संसारात ढवळाढवळ केलीस मात्र माझ्या मुलांच्या वाटेला जायचं नाही असं म्हणत संजनाच्या कानशिलात लगावते. 

अनिरूद्ध आणि अरूंधती यांचा लवकरच घटस्फोट होईल. अरूंधती घरातून निघून जाण्यापूर्वीच नवी व्यक्ती देशमुख कुटुंबात प्रवेश करणार आहे. त्यामुळे आता अनघा देशमुख कुटुंबात प्रवेश करते की अंकिता हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह