Join us  

इंडस्ट्रीत तुझी इज्जत काय...? मुकेश खन्ना यांचा पुन्हा गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा

By रूपाली मुधोळकर | Published: October 09, 2020 5:26 PM

सोशल मीडियावर  नवे ‘महाभारत’

ठळक मुद्देचलो, दुनिया को दिखाते हैं कि इंडस्ट्री में तुम्हारी क्या इज्जत है और मेरी क्या, असे म्हणत मुकेश खन्ना यांनी गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘महाभारत’ या टीव्हीवरच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकेतील दोन दिग्गज कलाकारांमध्ये  सध्या सोशल मीडियावर तुफान ‘युद्ध’ छेडले आहे.  ‘भीष्म पितामह’ मुकेश खन्ना आणि ‘धर्मराज युधिष्ठिर’ गजेंद्र चौहान यांच्यातील ख-या आयुष्यातील हे ‘महाभारत’  चर्चेचा विषय बनले आहे.‘कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी होण्यावरून हा वाद सुरु झाला आणि बघता बघता एकमेकांची उणी दुणी काढण्यापर्यंत पोहोचला. याच वादाच्या पार्श्वभूमीवर गजेंद्र चौहान यांनी मुकेश खन्ना यांना फ्लॉप अ‍ॅक्टर म्हणत, त्यांच्यावर अनेक आरोप केले होते. मुकेश खन्ना यांनी आता या आरोपाला उत्तर दिले आहे. ‘धर्मराज’ने माझ्यावर अनेक आरोप केले, त्याचे उत्तर देणे गरजेचे झाले आहे. चलो, दुनिया को दिखाते हैं कि इंडस्ट्री में तुम्हारी क्या इज्जत है और मेरी क्या, असे म्हणत मुकेश खन्ना यांनी गजेंद्र चौहान यांच्यावर निशाणा साधला.

मुकेश खन्ना म्हणाले,‘धर्मराज’ने माझ्यावर अनेक आरोप केले, त्याचे उत्तर देणे मला भाग आहे. त्यामुळे मी माझे म्हणणे मांडेल. खन्ना माझे सीनिअर आहेत. पण ते बोलले तर मी सुद्धा बोलेल, असे चौहान म्हणाले. अरे भावा, तू बोल. जेणेकरून लोक तुझा खरा चेहरा पाहतील.मी माझ्या 20 मालिका व 60 सिनेमांचा हिशेब देतो, तू तुझ्या 700 मालिका व 200 सिनेमांचा हिशोब दे. बघू, तू काय केलेस?  मी 1990 मध्येही तितकाच लोकप्रिय होतो, जितका आज आहे.

 तू मला फ्लॉप अ‍ॅक्टर म्हटले, तर भावा माझे 4 सिनेमे फ्लॉप झाले होते, मी नाही. आत्ताही माझे 10 सिनेमे डब्बाबंद आहेत. महाभारत या मालिकेने मला सर्व काही दिले. पण मी फ्लॉप अ‍ॅक्टर वा स्ट्रगलर म्हणून ही मालिका स्वीकारली नव्हती. माझी उंची त्यावेळीही तुझ्यापेक्षा अधिक होतो. तु अतिशय खालच्या दर्जाचे वक्तव्य केलेस, त्यातून तुझे विचार दिसतात.

काय आहे वाद‘महाभारत’ या पौराणिक मालिकेची स्टारकास्ट ‘द कपिल शर्मा शो’मध्य पोहोचली होती मालिकेच्या अनेक निवडक कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र महाभारतात भीष्म पितामहची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना हे मात्र यावेळी अनुपस्थित होते. मुकेश खन्ना ‘द कपिल शर्मा शो’मध्ये का आले नाहीत? असा प्रश्न साहजिकच सर्वांना पडला होता. अखेर  मुकेश खन्ना यांनीच एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट करत या प्रश्नाचे उत्तर दिले होते. ‘द कपिल शर्मा शो’ एक वाह्यात शो आहे. येथे पुरूष महिलांचे कपडे घालून किळसवाणे विनोद करतात आणि लोक त्यावर हसतात, असे ते या ट्विटमध्ये म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला  महाभारतात युधिष्ठिराचे पात्र साकारणारे अभिनेते गजेंद्र चौहान यांनी उत्तर दिले होते. कदाचित द्राक्ष खायला मिळाली नाहीत, म्हणून मुकेश खन्ना यांना द्राक्ष आंबट लागत आहेत, असा टोमणा त्यांनी मारला होता.मुकेश खन्ना यांनी दिले उत्तर गजेंद्र चौहान यांच्या या टीकेला मुकेश खन्ना यांनी लगेच उत्तर दिले होते. मुकेश खन्नाला कपिल शर्मा शोमध्ये बोलवलेच नव्हते, असे स्वत:ला ‘धर्मराजजी’ म्हणत आहे. आपण नेहमी सत्य बोलतो, हा भ्रम यांना आहे, शेवटी धर्मराज जे आहेत. मी तर याला अज्ञान म्हणेल. जी यांनी खूप सारे फालतू सिनेमे करून कमावली आहे, असे ट्विट त्यांनी केले होते. 

टॅग्स :मुकेश खन्ना