Join us

या मराठी अभिनेत्रीने गुपचूप उरकला साखरपुडा, वर्षभरानंतर चाहत्यांसह शेअर केला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 13:16 IST

क्षितीजने 'मुळशी पॅटर्न' सिनेमात काम केले आहे. ऋचाने 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत झळकली होती, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतही ती राणा दाच्या ट्रेनरच्या भूमिकेत झळकली होती.

सध्या लग्नाचा मोसम सुरु आहे. सगळीकडे लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटीसुद्धा याला अपवाद नाहीत. गेल्या काही महिन्यांत अनेक मराठी सेलिब्रिटींचं शुभमंगल पार पडलं आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही सेलिब्रिटी लग्नबंधनात अडकणार आहेत. यांत  अभिनेत्री ऋचा आपटे उल्लेख करावा लागेल. ऋचा  सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते.

आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते.  छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा ऋचाच्या अभिनयावर रसिक फिदा असतात. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यातही तिच्या चाहत्यांना खूप उत्साह असतो.

ऋचाने गेल्याच वर्षी अभिनेत्री क्षितीज दातेसोबत साखरपुडा केला होता. मात्र इतरांप्रमाणे ऋचाने तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांसह शेअर केली नव्हती. आता तिचा साखरपुडा होऊन वर्ष झाले आहे. त्याचनिमित्ताने तिने तिच्या आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसह शेअर करत आपला आनंद व्यक्त  केला आहे.शेअर केलेल्या या फोटोमध्ये ऋचा आणि क्षितीज रोमँटीक अंदाज दिसत आहे.  तिचे हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. 

क्षितीजने 'मुळशी पॅटर्न' सिनेमात काम केले आहे. ऋचाने 'दिल दोस्ती दुनियादारी' मालिकेत झळकली होती, 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतही ती राणा दाच्या ट्रेनरच्या भूमिकेत झळकली होती. सध्या 'अस्सं माहेर नको गं बाई' मालिकेत ऋचा झळकत आहे.

याशिवाय अनेक मराठी सिनेमा आणि नाटकांतून तिने महत्वपूर्ण भूमिका बजावल्या आहेत. तब्बल एक वर्षानंतर या दोघांनी साखरपुड्याचे फोटो शेअर करताच चाहत्यांनी तसेच कलाकारांनी देखील त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

विशेष म्हणजे ऋचा आणि क्षितिज 'बन मस्का' या मालिकेतून एकत्रित काम करत होते. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची खूप चांगली मैत्री झाली आणि त्या मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या आवडीनिवडी जुळल्या एकमेकांच्या कुटुंबाच्या उपस्थित दोघांनीही साखरपुडा केला होता.दोघांचा साखरपुडा झाला असला तरीही  सनई चौघडे कधी वाजणार अर्थात त्यांच्या लग्नाची तारीख काय हे अद्याप समोर आलेले नाही.