Join us

रसिकांना हसवण्यासाठी 'चला हवा येऊ द्या'चे कलाकार घेतात इतकी मेहनत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 16:18 IST

हसणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, हसल्याने आयुष्य वाढतं. पण आपल्याला पोट दुखेपर्यंत हसवणारे हे विनोदवीर त्यांच्या सेन्स ऑफ हयुमर ...

हसणं हे आरोग्यासाठी चांगलं असतं, हसल्याने आयुष्य वाढतं. पण आपल्याला पोट दुखेपर्यंत हसवणारे हे विनोदवीर त्यांच्या सेन्स ऑफ हयुमर आणि टाईमिंगवर किती सराव करतात याची प्रेक्षकांना काहीच कल्पना नसते. परदेशवारी करून आलेल्या झी मराठी वाहिनी वरील लोकप्रिय कार्यक्रम चला हवा येऊ द्या मधील पुणेरी बाई असो, भाऊची इंग्लिश किंवा कुशल बद्रिकेनी कलाकारांची केलेली नक्कल सगळी दुःख विसरायला लावत रसिकांना खळखळून हसायला भाग पाडणारे या कार्यक्रमाचे सर्वच विनोदवीर रसिकांचे लाडके बनले आहेत. त्यामुळे निलेश साबळे, भाऊ कदम, सागर कारंडे, कुशल ब्रद्रिके, भारत गणेशपुरे आणि श्रेया बुगडे सा-यांचे फेव्हरेट आहेत.आपले आवडते कलाकार दिवस रात्र एक करून रसिकांचे मनोरंजन करत असतात.'वर्ल्ड लाफ्टर डे'च्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांच्या लाडक्या विनोदवीरांनी प्रेक्षकांना ही हसवणं किती मोठी जबाबदारी आहे यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे.श्रेया बुगडे कॉमेडी हा खूप कठीण जॉनर आहे आणि सर्वात जास्त कठीण म्हणजे प्रेक्षकांची संवेदनशीलता लक्षात घेऊन कलाकारांना कॉमेडी करावी लागते. असभ्यता आणि विनोद यांच्यामध्ये समतोल साधावा लागतो आणि हे खूप जास्त कठीण आहे. मला खूप अभिमान आहे की मी ज्या टीमसोबत काम करते ती या सर्व गोष्टींचा सारासार विचार करते.'चला हवा येऊ द्या'ला एक कॉमेडी पण कौटुंबिक कार्यक्रम बनवणं एक टफ टास्क आहे पण प्रेक्षकांना खळखळून हसवणंआणि त्यांचं मनोरंजन करणं याची जबाबदारी आम्हा सर्वांवर आहे. तर वर्ल्ड लाफ्टर डेच्या निमित्ताने आम्ही प्रेक्षकांना असच हसवत राहण्याचं वाचन देतो.कुशल बद्रिके गाण्यांचे कार्यक्रम वर्षानुवर्षे चालतात कारण त्यात नवीन जुनी अशी गाणी सादर केली जातात. पण जेव्हा प्रेक्षकांना हसवायचं असतं तेव्हा तुम्हाला प्रत्येक वेळी एक नवीन विनोद निर्माण करावा लागतो. एकदा झालेला विनोद तुम्ही परत करू शकत नाही. त्यामुळे प्रेक्षकांना हसवणं ही नक्कीच मोठी जबाबदारी असते. मला प्रत्येक विनोदी अभिनेत्याबद्दल अपार आदर आहे कारण प्रेक्षकांना हसवण्यासाठी त्यांना स्वतःचे दुःख,त्यांच्या आयुष्यातील ताण तणाव, प्रॉब्लेम्स सगळं विसरून काम करावं लागतं. आम्ही असंच प्रेक्षकांना हसवत राहू आणि त्यांनी पण आमच्यावर असंच प्रेम करत राहावं.सागर कारंडे एखाद्याला रडवायचं असेल तर आपण त्याला कसही रडवू शकतो. त्या व्यक्तीच मन दुखावून, त्याला काही बोलून आपण त्या व्यक्तीला रडवू शकतो पण एखाद्याला हसवायचं पण त्या व्यक्तीने ठरवलं की मी हसणारच नाही आणि आपल्याला हे माहिती नसेल की कुठल्या गोष्टीवर त्या व्यक्तीला हसायला येईल तर त्याला हसवण्यासारखं कठीण दुसरं कुठलाही काम नाही असं मला वाटत.विनोदी अभिनेत्याचं देखील तसेच आहे, त्याचा प्रेक्षक कसा आहे, त्यांना कुठलाविनोद आवडेल, हे माहित नसताना प्रेक्षकांना हसवणं ही गोष्ट अवघड आहे.