यांच्या आग्रहामुळे करिना कपूरने केले सैफ अली खानशी लग्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2018 10:22 IST
येत्या 27 मे रोजी होत असलेल्या ‘आयपीएल क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्यापूर्वी दोन तास ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘क्रिकेट फायनल पार्टी ...
यांच्या आग्रहामुळे करिना कपूरने केले सैफ अली खानशी लग्न!
येत्या 27 मे रोजी होत असलेल्या ‘आयपीएल क्रिकेट स्पर्धे’च्या अंतिम सामन्यापूर्वी दोन तास ‘स्टार प्लस’ वाहिनीवर ‘क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है’ या विशेष कार्यक्रमाचे प्रसारण केले जाईल. या कार्यक्रमात बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांमधील अनेक सेलिब्रिटी एकत्र येणार असून त्यामुळे या कार्यक्रमास एक आगळेच ग्लॅमर प्राप्त होईल.या कार्यक्रमातील काही सेलिब्रिटींचे चित्रीकरण अद्याप बाकी असले, तरी बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर-खानने आपले चित्रीकरण नुकतेच पूर्ण केले. यावेळी ती आपल्या नेहमीच्या मनस्वी आणि विनोदी स्वभावात होती आणि यावेळी तिने आपल्या जीवनातील मैत्रीच्या स्थान किती अढळ आहे हे करिनाने सांगितले. अपारशक्ती खुराणाबरोबर गप्पा मारताना करीना म्हणाली, “जीवनात मी नातेसंबंधांना, विशेषत: मैत्रीच्या नात्याला फार महत्त्व देते. माझ्या दृष्टीने तुमचे मित्र हे तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती असतात. किंबहुना माझ्या मित्र-मैत्रिणींनी आग्रह केला नसता, तर मी आजही बिनलग्नाचीच राहिली असते. माझ्या मित्र-मैत्रिणींनी मला नेहमीच पाठिंबा आणि आधार दिला असून माझ्या आयुष्यातील सर्व बऱ्या-वाईट प्रसंगांत ते माझ्याबरोबर राहिले आहेत. ते सदैव माझ्या जीवनाचा एक अविभाज्य हिस्सा बनून राहतील.” ‘क्रिकेट फायनल पार्टी तो बनती है’ या विशेष कार्यक्रमात बॉलिवूड आणि टीव्ही मालिकांतील अनेक सेलिब्रिटी सहभागी होऊन या कार्यक्रमाला एक आगळी शोभा आणतील.ALSO READ : OMG : ‘वीरे दी वेडिंग’ला मिळाले ‘ए’ सर्टिफिकेट; अश्लील संवादामुळे सेन्सॉर बोर्डाचा निर्णय!करिना कपूरचा वीरे दी वेडिंग चित्रपटाचे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात करीनासह सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट म्हणजे चार मुलींची कथा आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करीना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे.