Join us  

अखेर, राधिकाने सौमित्रसह लग्न करण्यास दिला होकार, मालिकेत येणार नवीन वळण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 3:40 PM

'माझ्या नव-याची बायको' ही मालिका दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. त्यामुळेच ही मालिका टीआरपी रेटींगमध्येही आपले स्थान टिकवून आहे.

'माझ्या नव-याची बायको' ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. त्यामुळेच  ही मालिका टीआरपी रेटींगमध्येही आपले स्थान टिकवून आहे.  आता मालिका रंजक वलणावर येवून पोहचली आहे.  सौमित्र राधिकाने त्याच्याशी लग्न करावे यासाठी प्रयत्न करत आहे. त्यासाठी राधिकाची सगळेच समजूतही काढताना पाहायला मिळाले. अखेर सौमित्रला लग्नासाठी राधिका होकार देते. त्यामुळे रसिकही ज्या गोष्टीची वाट पाहात आहेत तो क्षण त्यांना लवकरच पाहायला मिळणार आहे. तर दुसरीकडे शनाया ही लग्न करणार आहे. 

 गुरुनाथ एका गरीब वस्तीत राहून कसतरी दिवस ढकलतोय तर दुसरीकडे शनाया आणि तिची मम्मा पोपटरावकडे ऐषोआरामात राहत आहेत. सुलक्षणा बाईंनी सांगितल्याप्रमाणे पोपटराव शनायाशी लग्न करण्यासाठी १० कोटींची व्यवस्था करतो. इतकंच नव्हे तर सुलक्षणा आणि शनायावर पळत ठेवण्यासाठी पोपटराव दोन पंटर देखील ठेवतो. शनयाला पोपटसोबत लग्न करायचा नसल्यामुळे ती टेंन्शनमध्ये आहे. 

शनायाच लग्न पोपटसोबत न लावता १० कोटी घेऊन पसार कसं होता येईल याबद्दल सुलक्षणा विचार करतेय. ती शनायाला यासाठी गुरुची मदत घ्यायला सांगते. शनाया मम्माने सांगितल्याप्रमाणे गुरुची मदत घ्यायला जाते. पण गुरूच्या कठीण काळात शनायाने ओळख देखील दाखवली नव्हती त्यामुळे गुरु तिची मदत करणार का? दुसरीकडे पोपटरावने लग्नाची सर्व तयारी केली आहे. शनाया आणि पोपटच लग्न होणार का? सुलक्षणाचा पुढचा डाव काय असेल? हे सर्व प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायको