Join us  

​प्रत्युषा बॅनर्जीच्या आत्महत्येच्या वेळी चर्चेत आलेल्या या अभिनेत्रीसोबत तिचा प्रियकर करतोय लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 6:31 AM

प्रत्युषा बॅनर्जीने बालिकावधू या मालिकेत साकरलेली आनंदी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. १ एप्रिल २०१६ ला तिने तिच्या ...

प्रत्युषा बॅनर्जीने बालिकावधू या मालिकेत साकरलेली आनंदी ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. १ एप्रिल २०१६ ला तिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या मृत्यूसाठी तिचा प्रियकर राहुल राज सिंह जबाबदार असल्याचे प्रत्युषाच्या कुटुंबियांचे आणि मित्रमैत्रिणींचे म्हणणे होते. प्रत्युषाने आत्महत्या केली त्यादिवशी राहुल तिच्यासोबतच होता. राहुल आणि प्रत्युषा लिव्ह इन मध्ये राहात होते. तिने सकाळीच ड्रिंक केले होते आणि राहुल जेवण आणण्यासाठी बाहेर गेला होता. तिने घराची बेल बंद केली होती. तसेच दरवाज्याला डबल लॉक लावले होते. त्यामुळे राहुल घरी परतल्यानंतर काही तरी गडबड असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने अनेकवेळा दरवाजा ठोठावला. पण प्रत्युषाने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. मग त्याने तिला फोन केलेत, मॅसेजही केले. तो किल्लीवाल्याला घेऊन येण्यासाठी खाली उतरला. पण तेवढ्यात त्याला त्याच्या घरी काम करणारा माणूस दिसला. त्या माणसाने बाल्कनीतून उडी मारून दरवाजा आतून उघडला तर प्रत्युषा पंख्याला लटकलेली होती. तिला लगेचच रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. प्रत्युषाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली आहे असा दावा तिच्या कुटुंबियांनी केला होता. कारण मृत्यूपूर्वी काही दिवस आधी प्रत्युषा गर्भवती होती आणि मृत्यूच्या आधी तिने गर्भपात केला होता, अशी माहिती पोस्टमोर्टम रिपोर्टमधून पुढे आली होती. पण प्रत्युषाला मी मारले नाही असे राहुलने म्हटले होते. एवढेच नव्हे तर तिच्या मृत्यूनंतर त्याची अवस्था अतिशय वाईट झाली होती. तो डिप्रेशनमध्ये देखील गेला होता. राहुल सहानभूती मिळवण्यासाठी हे सगळे काही करत आहे असे प्रत्युषाच्या घरातल्यांचे म्हणणे होते. कारण राहुल त्याची मैत्रीण सलोनीसोबत नात्यात असल्याने प्रत्युषा आणि त्याच्यात सतत भांडणे होत होती, असे तिच्या मित्रमैत्रिणींनी पोलिसांना सांगितले होते. याच सलोनीसोबत आता राहुलने लग्न करण्याचे ठरवले आहे. राहुलने इन्स्टाग्रामद्वारे ही गोष्ट सगळ्यांना सांगितली आहे. त्याने सलोनीसोबतचा एक फोटो पोस्ट करून लिहिले आहे की, माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार आले. आयुष्यात येणारे वाईट प्रसंग तुम्हाला कमकूवत बनवत नाहीत तर खूप काही शिकवतात. माझ्या वाढदिवसाला ज्यांनी मला विश केले, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. मी विशेषतः सलोनीचे आभार मानतो. ती लवकरच माझी पत्नी होणार आहे. माझ्यासोबत जेव्हा कोणीही नव्हते, तेव्हा सलोनीने मला साथ दिली. राहुलचे हे दुसरे लग्न असणार असून प्रत्युषा त्याच्या आयुष्यात येण्याआधी त्याचे लग्न झालेले होते. प्रत्युषाच्या मृत्यूनंतर सलोनी आणि राहुलच्या नात्याची मीडियात चर्चा झाली होती. पण त्यानंतर त्यांच्यात काही वादविवाद झाले होते. त्या दरम्यान दाक्षिणात्य अभिनेत्री सीता नारायण सोबत राहुल नात्यात असल्याची चर्चा होती. पण आता सलोनी आणि राहुल यांच्यातील वाद मिटले असून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. Also Read : ​प्रत्युषाच्या आत्महत्येच्यादिवशी काय झाले होते?