Join us  

एक वर्षाच्या लीपनंतर ‘छत्रीवाली’ मालिकेतल्या विक्रम-मधुराचं नातं नव्या वळणावर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 3:45 PM

खास बात म्हणजे विक्रमच्या बदललेल्या लूकला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे.

छोट्या पडद्यावरील ‘छत्रीवाली’ मालिकेत आलंय नवं वळण. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या विक्रम-मधुरामधलं नातं आता संपलंय. आपल्या वडिलांचा खून विक्रमच्या वडिलांनीच केलाय हे कटु सत्य मधुरासमोर उघड झाल्यानंतर मधुराने विक्रमपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. विक्रमने मधुराची माफी मागितली, तिला मनवण्याचा प्रयत्नही केला पण मधुरा मात्र तिच्या मतावर ठाम राहिली. मधुराच्या निर्णयाने खचलेला विक्रम आजही आपलं प्रेम विसरलेला नाही. नातं संपलं असलं तरी प्रेम नाही. आजही मधुरा परत येईल असा विश्वास त्याला वाटतोय. विक्रम-मधुराला पुन्हा एकत्र आणणारा क्षण मालिकेत येईल का याची उत्सुकता आहे.

खास बात म्हणजे विक्रमच्या बदललेल्या लूकला प्रेक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहेत. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या कबीर सिंह सिनेमातल्या शाहिद कपूरच्या लूकशी मिळता-जुळता असा विक्रमचा लूक आहे. मधुराचं मन पुन्हा जिंकण्यात विक्रमला यश मिळणार का? हे ‘छत्रीवाली’ मालिकेच्या पुढील भागांमध्ये पाहायला मिळेल. 

‘छत्रीवाली‘ ही मालिका आत्मविश्वासू, कष्टाळू आणि साधेपणात सौंदर्य शोधणाऱ्या मधुराची. तर तिकडे जबाबदारीचं भान नसलेला, लाडात वाढलेला मधुराच्या अगदी विरुद्ध स्वभावाचा आणि तिच्या साधेपणाची सतत टिंगल उडवणारा विक्रम आहे. या दोघांवर आधारीत मालिका आहे. ‘छत्रीवाली‘ या मालिकेत संकेत पाठक आणि नम्रता प्रधान ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळाली.  संकेत पाठकने या पूर्वी स्टार प्रवाहच्याच दुहेरी या लोकप्रिय मालिकेत दुष्यंत ही व्यक्तिरेखा साकारली होती तर नम्रताची ही पहिलीच मालिका आहे.