बिग बॉस : मनवीर गुर्जरला मिळाले ग्रॅण्डफिनालेचे तिकीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 15:25 IST
आतापर्यंतच्या बिग बॉस सिझनमध्ये आपण प्रेमप्रकरणे बहरताना बघितली, मात्र बिग बॉस सिझन-१० मध्ये पहिल्यांदाच मैत्री फुलल्याचे बघावयास मिळत आहे. ...
बिग बॉस : मनवीर गुर्जरला मिळाले ग्रॅण्डफिनालेचे तिकीट
आतापर्यंतच्या बिग बॉस सिझनमध्ये आपण प्रेमप्रकरणे बहरताना बघितली, मात्र बिग बॉस सिझन-१० मध्ये पहिल्यांदाच मैत्री फुलल्याचे बघावयास मिळत आहे. होय, मनवीर गुर्जर आणि मनू पंजाबी यांची मैत्री अशी काही रंगात आली आहे की, बिग बॉसच्या ताजपासून या दोघा मित्रांनी इतर सर्व प्रतिस्पर्धांना जणू काही कोसो दूर ठेवले आहे. गेल्या मंगळवारी बिग बॉसने दिलेल्या ग्रॅण्डफिनाले टिकिटाच्या टास्कमध्ये हे प्रकर्षाने दिसून आले असून, दोघा मित्रांच्या प्लॅनिंगने हा टास्क तर नावावर केलाच शिवाय मनवीर गुर्जरला ग्रॅण्डफिनालेचे टिकीट तर मनू पंजाबीला घरातील कॅप्टनशिपचा ताजही मिळवून दिला. }}}} शोमध्ये सुरुवातीपासूनच समजूतदारपणाने वागणाºया अन् वेळप्रसंगी स्टॅण्ड घेणाºया मनू आणि मनवीरचा घरातील प्रवास अतिशय रोमांचक असा राहिला आहे. कदाचित त्यांच्या या स्वभावामुळेच प्रेक्षकांनी त्यांना अद्यापपर्यंत बिग बॉसच्या घरात राहण्याची संधी दिली आहे. आता तर ते थेट बिग बॉसच्या विनिंग ट्रॉफीच्या अगदीच जवळ पोहचले असून, त्यावर नाव कोरण्यासाठी ते काही अंतरच मागे आहेत. कारण शोमध्ये जे स्ट्रॉँग सदस्य समजले जात होते, ते केव्हाच घराबाहेर पडल्याने मनू आणि मनवीर हे बिग बॉस सिझन-१० चे फेव्हरेट कंटेस्टेंट समजले जात आहेत. गेल्या मंगळवारी बिग बॉसने घरातील सदस्यांसाठी ‘सोलर सिस्टम टास्क’ दिला होता. ज्यामध्ये सर्व घरवाल्यांना गार्डन एरियामध्ये लावण्यात आलेल्या चार आॅर्बिटला चक्कर मारायचे असतात. यावेळी सर्वांच्या हातात पाण्याने भरलेला एक कटोरा देण्यात आला होता. चक्कर मारताना कटोºयातील पाणी सांडणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यायची असते. ज्या सदस्याच्या कटोºयातील पाणी साडणार तो सदस्य टास्कमधून बाहेर पडणार असतो. त्याचबरोबर तो ग्रॅण्डफिनालेच्या तिकिटापासूनही दूर होणार असतो. टास्क सुरू होताच रॅँकिंगमध्ये सर्वोच्च स्थानावर असलेल्या लोपामुद्राला थेट दुसºया आॅर्बिटपासून चालण्याची सूट मिळते. तर मनू, मनवीर, मोना, नीतिभा आणि बानी आॅर्बिटच्या पहिल्या स्थानावरून फिरण्यास सुरुवात करतात. मनू मस्तीच्या मुडमध्ये सगळ्याचीच थट्टा करतो. मात्र त्याची ही बाब नीतिभाला आवडत नाही. त्याचकारणाने दोघांमध्ये वाद होतो. त्यानंतर संतापलेला मनू मनवीरला म्हणतोय की, मी नीतिभाला धक्का देऊन पाडणार आहे. नीतिभा त्याला उत्तर देताना तो कोणाला पाडू शकत नाही, असे म्हणते. काही वेळानंतर मोनाला चक्कर येत असल्याने ती टास्कमधून स्वत:हून बाहेर पडते. }}}} त्याचबरोबर या टास्कमधून घरवाल्यांना ब्रेक दिला जातो. याच दरम्यान मनू आणि मनवीर प्लॅनिंग करतात. दुसरा राऊंड सुरू होतो. यावेळी लोपामुद्राला त्यांच्यासोबत आॅर्बिटमध्ये चालायचे असते. सर्व सदस्य जोरात चालण्यास सुरुवात करतात. त्यामुळे लोपा आणि मनवीरमध्ये वाद होतो. मनवीर धक्का देत असल्याचे लोपा म्हणते. मात्र याच दरम्यान तिच्या शूजच्या लेस सुटतात. मात्र आॅर्बिटवर थांबता येत नसल्याने तिला तसेच चालावे लागते. याच दरम्यान ती पाय घसरून खाली पडते अन् टास्कमधूनही बाहेर पडते. मात्र यासाठी ती मनू आणि मनवीरला दोष देते. त्यानंतर पुन्हा ब्रेक होतो. याच दरम्यान मनू मनवीरला म्हणतो की, मला कॅप्टन व्हायचे आहे. गेल्या आठवड्यात मनवीरला कॅप्टन होण्यासाठी मनूने त्याला संधी दिली होती. त्यामुळे मनवीर त्याला यासाठी मदत करतो. पुढच्या राऊंडमध्ये नीतिभा आॅर्बिटवरून घसरून पडते अन् टास्कमधून बाहेर होतेय. आता फक्त मनवीर, मनू आणि बानीमध्येच लढत असते. याचदरम्यान बिग बॉस टास्क दुसºया दिवशी सुरू करण्याचे आदेश देतात. }}}} त्यानुसार दुसºया दिवशी तिघांना आॅर्बिटच्या सर्वांत वरच्या गोलाकार भागात चक्कर मारायचे असतात. त्याचदरम्यान बानीला टास्कमधून बाहेर काढण्यासाठी मनू आणि मनवीर प्लॅनिंग करतात. त्याचबरोबर दोघेही एकाला कॅप्टनशिप अन् दुसºयाला थेट ग्रॅण्डफिनालेचे तिकीट, असेही ठरवितात. त्यांचा हा डाव पूर्णत: यशस्वी होतो. मात्र याचदरम्यान बानी अन् मनू आणि मनवीरचे जोरदार भांडण होते. या दोघांनी प्लॅनिंग करून मला टास्कबाहेर काढल्याचा आरोप करीत ती घरात एकटीच रडत बसते. आता लढत मनू आणि मनवीर या दोघांमध्ये असते. बिग बॉस यासाठी दोघांना पब्लिकमध्ये पाठविण्यासाठी एक योजना आखतात. ज्यावरून त्यांना लोकांचे मने जिंकून हा टास्क आपल्या नावे करायचा असतो. यामध्ये मनवीर बाजी मारतो अन् थेट ग्रॅण्डफिनालेचे तिकीट मिळवतो.