'मेरी आावाजही पेहचान है' मालिकेतील कलाकार अमृता राव आणि अदिती वासूदेव या दोघींमध्ये काहीतरी बिनसलंय. गेल्या काही दिवसांमध्ये दोघींनी एकमेकांशी एक शब्दही बोलल्या नाहीत. दोघींनी एकमेकांबरोबर शुटींग करण्यासहीनकार दिल्यामुळे सेटवर रोज दोन युनिट लावून शुटींग करावं लागतंय.यामुळे मालिकेची प्रोडक्शन टीम सध्या भलतीच वैतागलीय. दोघींच्या अंहकारामुळे याचा कामावर परिणाम होत असून इतर कलाकारांवरही याचा परिणाम होतोय. त्यामुळे सेटवर सध्या दुषित वातावरण पसरत असल्याच्या चर्चा रंगतायेत.
अमृता राव आणि अदिती वासूदेवमध्ये बिनसलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 13:11 IST