Join us

​ऐश्वर्या नारकर यांनी 'लेक माझी लाडकी'च्या सेटवर बनवल्या नारळाच्या वड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 16:52 IST

मालिकांचा सेट म्हटला की त्यावर खूप गमतीजमती घडत असतात. मालिकेचे चित्रीकरण हे कमीत कमी दिवसातील दहा-बारा तास सुरू असते. ...

मालिकांचा सेट म्हटला की त्यावर खूप गमतीजमती घडत असतात. मालिकेचे चित्रीकरण हे कमीत कमी दिवसातील दहा-बारा तास सुरू असते. त्यामुळे मालिकेतील कलाकार हे आपल्या घरापेक्षाही जास्त वेळ हा मालिकेच्या सेटवर घालवतात. त्यामुळे मालिकांचे चित्रीकरण करत असताना त्यांच्यामध्ये खूप चांगले नाते निर्माण होते. मालिकेची टीम ही कलाकारांना त्यांच्या कुटुंबासारखीच वाटू लागते. स्टार प्रवाहची 'लेक माझी लाडकी' ही मालिकाही त्याला अपवाद नाही. 'लेक माझी लाडकी' ही मालिका सुरू होऊन आता कित्येक महिने झाले आहेत. त्यामुळे या मालिकेतील सगळेच कलाकार आणि तंत्रज्ञ हे एकमकेांचे खूप चांगले मित्रमैत्रीण बनले आहेत. त्यामुळे सेटवर नेहमीच हे कलाकार आणि तंत्रज्ञ मिळून काही ना काही करत असतात. या मालिकेच्या सेटवर नुकतीच सगळ्यांना गोड मेजवानी मिळाली. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनी संपूर्ण टीमसाठी नारळाच्या वड्या बनवल्या होत्या.'लेक माझी लाडकी' मालिकेच्या सेटच्या परिसरात बरीच नारळाची झाडे आहेत. नारळाच्या झाडांवरून नुकतेच अनेक नारळ काढण्यात आले. हे काढलेले नारळ पाहून ऐश्वर्या नारकर यांना या नारळापासून खूप चांगल्या नारळाच्या वड्या बनतील असे वाटले आणि त्यांनी या नारळापासून वड्या करायचे ठरवले आणि त्यांच्या सुचनेनुसार सेटवरच नारळाच्या वड्या तयार झाल्या. या छान खमंग गोड वड्यांवर सेटवरच्या सर्वांनी ताव मारला नसता तर नवलच... याविषयी ऐश्वर्या नारकर सांगतात, “आम्ही सेटवर फावल्या वेळात बरीच धमाल मस्ती करत असतो, खादाडी करत असतो. याआधीही आम्ही मेथांबा, मिसळ असे बरेच पदार्थ केले आहेत. सेटवर नारळ पाहून नारळाच्या वड्या करण्याची कल्पना मला सुचली आणि आम्ही लगेचच वड्या केल्या देखील. या वड्या करताना खूप मजा आली. ताज्या वड्या आम्ही सर्वांनी मिळून खाल्ल्या.”लेक माझी लाडकी या लोकप्रिय मालिकेत मीरा आणि इरावती यांच्या आयुष्यात काय घडतंय हे प्रेक्षकांना आगामी भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. Also Read : ​हिंदी मालिकेत काम करायचे आहेः सायली देवधर