Join us  

आमिर खाननंतर आता या अभिनेत्याने सोशल मीडिया सोडण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 11:06 AM

सोशल मीडियावरून ब्रेक घेत असल्याचे या अभिनेत्याने ट्विटरवर सांगितले आहे.

सावधान इंडियाचा माजी सूत्रसंचालक सुशांत सिंगदेखीलआमिर खानच्या पावलांवर पाउल ठेवत आहे. सुशांत सिंगने निर्णय घेतला आहे की तो सोशल मीडियावरून ब्रेक घेतो आहे. त्याने ही माहिती ट्विटरवर दिली आहे. सुशांतने ट्विटरवर लिहिले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून ब्रेक घेतो आहे. रिबूटची गरज आहे.

सुशांत सिंगने ट्विटरवरील त्याच्या मेसेजचे स्क्रीनशॉट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. सुशांतच्या या निर्णयाला काही चाहत्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. तर त्याने असा निर्णय का घेतला असेल, त्यामुळे वैतागले आहेत.

सुशांत सिंग बऱ्याच कालावधीपासून सावधान इंडिया शोचे सूत्रसंचालन करत होता. मात्र २०१९मध्ये सुशांतला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. शोमध्ये घेतलेल्या निर्णयाचा चाहत्यांना खूप राग आला होता. त्यांनी सुशांतला शोमध्ये पुन्हा आणण्याचे आवाहन केले होते, मात्र तसे झाले नाही.

सुशांत सिंगने भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा आणि जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईचा त्याने निषेध केल्यानंतर त्याला मालिकेतून काढण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी असे वृत्त आले होते की सीआयडीचा दया म्हणजेच दयानंद शेट्टी या शोचे सूत्रसंचालन करणार आहे.मात्र सुशांत या मालिकेतून काढल्यानंतर सावधान इंडिया एका पोलीस अधिकाऱ्याच्या दृष्टीकोनातून सादर केला होता. म्हणजेच शोमध्ये जो पोलीस अधिकारी बनत होता तोच शोचे सूत्रसंचालन करत होता.

टॅग्स :आमिर खानसुशांत सिंग