Join us  

सलमान खानने ऐश्वर्याच्या लग्नावर केलेलं वक्तव्य आलं होतं चर्चेत, म्हणाला होता - "प्रेम करणारी व्यक्ती..."

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 6:25 PM

Salman Khan And Aishwarya Rai Bachchan : जेव्हा सलमान खानला ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत केलेल्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा भाईजानने दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले.

सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी कुणापासून लपलेली नाही. एक काळ असा होता की दोघांना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता वाढायची. पण दुर्दैवाने त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. रिलेशनशीप तुटल्यानंतर सलमान आणि ऐश्वर्याने एकमेकांशी असलेले सर्व संबंध संपवले. दोघेही एकमेकांबद्दल काहीही बोलण्यास टाळाटाळ करतात. पण एका मुलाखतीत सलमानने त्याच्या एक्स अर्थात ऐश्वर्या रायच्या लग्नाबद्दल मोकळेपणाने सांगितले होते. रजत शर्माच्या या मुलाखतीत सलमानने नाव न घेता त्याचे ब्रेकअप स्वीकारत आपली व्यथा मांडली. एक्स बॉयफ्रेंडच्या नात्याने ती खूश आहे हे चांगले वाटते. 

जेव्हा सलमान खानला ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनसोबत केलेल्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा भाईजानने दिलेल्या उत्तराने पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेतले. सलमानने कोणाचेही नाव न घेता त्याचे उत्तर दिले. सलमान म्हणाला, "हे घडून खूप वेळ निघून गेला आहे. आता त्याची आठवण करण्यात काही अर्थ आहे असे मला वाटत नाही. आता भूतकाळ विसरणे चांगले आहे. तो म्हणाला, जर तुमची आवडती व्यक्ती विभक्त झाल्यानंतर दुःखी राहिली तर तुम्हालाही वाईट वाटते, पण जर तो आनंदी असेल तर तुम्हालाही आनंद होतो. सलमान म्हणाला की, अभिषेक बच्चन खूप अप्रतिम व्यक्ती आहे.

त्याच्या भूतकाळातील नात्याचा विषय फिरवत सलमानने अभिषेकचे कौतुक केले आणि म्हणाला, "अभिषेक खूप चांगला माणूस आहे आणि ती त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. दोघेही एकमेकांसाठी बनलेले आहेत. तिचे लग्न मोठ्या कुटुंबात झाले आहे. मागील काही गोष्टींना आता काही महत्त्व नाही. सलमान खानने आपल्या उत्तरांमध्ये कुठेही ऐश्वर्याचे नाव घेतले नाही आणि आपले मतही व्यक्त केले. ब्रेकअप म्हणजे सर्व काही संपले असे नाही, असेही तो म्हणाला. उलट, आपल्या एक्सला आनंदी पाहून आपणही आनंदी होऊ शकता.

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन