ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - बॉलिवुडमधील सर्वात चर्चित जोडपे रणबीर कपूर आणि कतरीना कैफमध्ये ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे. बॉलिवुडच्या बातम्या देणा-या '९एक्सई डॉट कॉम' ने रणबीर-कतरीनामध्ये दुरावा वाढल्याचे वृत्त दिले आहे. रणबीर-कतरीनाच्या दुराव्याला अभिनेत्री दिपीका पदुकोण जबाबदार असल्याचे वृत्तात म्हटले आहे.
'तमाशा' चित्रपटाच्या प्रसिध्दीसाठी दिपीका-रणबीर एकत्र आल्यापासून दोघांमध्ये मतभेद वाढल्याचे म्हटले आहे. रणबीर सध्या करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. रणबीर सोबत त्याची आई नीतू सिंगही तिथे आहे. रणबीर-कतरीनाच्या नात्याला सुरुवातीपासून नीतू सिंग यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी कधीही या नात्याला मंजुरी दिली नव्हती.
कतरीना आयुष्यात येण्याआधी रणबीरचे दिपीका बरोबर सूर जुळले होते. कतरीनामुळे दोघांमध्ये ब्रेकअप झाला होता. आता त्याच दिपीकामुऴे रणबीर-कतरीनाचे नाते शेवटाकडे चालले आहे.