shubhvivah fame actress kajal patil shared her experience said director used to called me at night
"दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा आणि...", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीतली काळी बाजू By कोमल खांबे | Published: March 28, 2024 3:12 PM1 / 8छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' मालिका. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. 2 / 8'शुभविवाह' मालिकेतून अभिनेत्री काजल पाटील घराघरात पोहोचली. या मालिकेत ती मानसी हे पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 3 / 8काजलने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अभिनयातील करिअरबद्दल भाष्य केलं. याबरोबरच सुरुवातीच्या काळात आलेला एक अनुभवही सांगितला. 4 / 8काजल म्हणाली, 'सुरुवातीला एक दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा. त्याच्यासोबत मी काम केलेलं नव्हतं. पण, त्याचे मला रात्रीच कॉल यायचे.'5 / 8'इंडस्ट्रीत आल्यानंतर ९-१० वाजल्यानंतर कोणाचेही फोन उचलायचे नाहीत, हे मी ठरवलं होतं. हा नियम मी स्वत:च घालून घेतला होता.' 6 / 8'कितीही कामाचा फोन असेल, तरीही मी उचलत नाही. कारण, मग ते आपल्याला गृहित धरतात. त्यामुळे काम असेल तर तुम्ही सकाळी फोन करा.' 7 / 8'यामुळेच मला वाटतं की त्यांनाही कळलं असेल की हे काही होणार नाही. म्हणून तेदेखील बॅकफूटवर गेले असतील.' 8 / 8काजलने 'कुलस्वामिनी' मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती झळकली. आणखी वाचा Subscribe to Notifications