Join us  

"दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा आणि...", 'शुभविवाह' फेम अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीतली काळी बाजू

By कोमल खांबे | Published: March 28, 2024 3:12 PM

1 / 8
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे स्टार प्रवाहवरील 'शुभविवाह' मालिका. या मालिकेतील कलाकारांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.
2 / 8
'शुभविवाह' मालिकेतून अभिनेत्री काजल पाटील घराघरात पोहोचली. या मालिकेत ती मानसी हे पात्र साकारून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे.
3 / 8
काजलने नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अभिनयातील करिअरबद्दल भाष्य केलं. याबरोबरच सुरुवातीच्या काळात आलेला एक अनुभवही सांगितला.
4 / 8
काजल म्हणाली, 'सुरुवातीला एक दिग्दर्शक रोज रात्री फोन करायचा. त्याच्यासोबत मी काम केलेलं नव्हतं. पण, त्याचे मला रात्रीच कॉल यायचे.'
5 / 8
'इंडस्ट्रीत आल्यानंतर ९-१० वाजल्यानंतर कोणाचेही फोन उचलायचे नाहीत, हे मी ठरवलं होतं. हा नियम मी स्वत:च घालून घेतला होता.'
6 / 8
'कितीही कामाचा फोन असेल, तरीही मी उचलत नाही. कारण, मग ते आपल्याला गृहित धरतात. त्यामुळे काम असेल तर तुम्ही सकाळी फोन करा.'
7 / 8
'यामुळेच मला वाटतं की त्यांनाही कळलं असेल की हे काही होणार नाही. म्हणून तेदेखील बॅकफूटवर गेले असतील.'
8 / 8
काजलने 'कुलस्वामिनी' मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक मालिकांमध्ये ती झळकली.
टॅग्स :स्टार प्रवाहटिव्ही कलाकार