Join us  

काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात जीवनसाथी म्हणून नाही घटस्फोटोनंतर बिपाशा बासूचा पतीने सोडले मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 2:18 PM

1 / 13
काही जण त्यांचं कौतुक करतात तर अनेकजण त्यांच्या लग्नावरून त्यांना ट्रोलही करतात.
2 / 13
विशेषतः तिसरं लग्न केल्याने करणसिंहला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं.
3 / 13
हे सगळं होत असताना अनेकांना करणसिंहने त्याची दुसरी पत्नी जेनिफर विंगेटशी काडीमोड का घेतला आणि बिपाशाशी लग्न का केलं हे जाणून घेण्याची उत्सुकता असते.
4 / 13
त्याने असं का केलं असा प्रश्न आजही अनेकांना पडतो.
5 / 13
यावरून अनेक चर्चाही ऐकायला मिळतात. मात्र यावर इतके दिवस मौन बाळगणाऱ्या करणने पहिल्यांदाच आपलं मौन सोडले होते.
6 / 13
‘बेहद’फेम अभिनेत्री जेनिफर विंगेटने यावर काही बोलण्याआधी करणने भूमिका मांडली होती.
7 / 13
जेनिफरशी लग्न करणं ही आपली घोडचूक होती असं करणने एका मुलाखतीत म्हटलं होतं.
8 / 13
काही जण मैत्रीच्या नात्यापर्यंत ठीक असतात. त्यांचा जीवनसाथी म्हणून विचार होऊ नये असं सांगत जेनिफरशी केलेल्या लग्नाबाबत त्यानं पश्चाताप व्यक्त केला होता.
9 / 13
घाईघाईत निर्णय घेऊन आपण चूक केली होती, मात्र भविष्यात त्याची पुनरावृत्ती करणार नाही असंही तो या मुलाखतीत म्हणाला होता.
10 / 13
'करण आणि माझे कॉम्बिनेशन खूप चांगले जमले आहे. आमच्या चांगली मैत्रीसुद्धा झाली आहे. शूटिंगवेळी आम्ही दोघांनी बराच वेळ एकत्र घालवला होता. तो खूप मेहनती आणि चांगला अभिनेता आहे.'
11 / 13
दोघांच्या आवडी-निवडी जुळल्यानंतर दोघेही लग्नबंधनात अडकले.
12 / 13
दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते.
13 / 13
त्याच्यातलं हे नातं लग्नानंतर अधिक घट्ट झालं असून दोघं एकमेकांची तितकीच काळजी घेतात.
टॅग्स :करण सिंग ग्रोव्हरबिपाशा बासू