Join us

6283_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2016 15:30 IST

युद्ध हे नेहमीच मानवी इतिहासाचे अंतरंग राहिले आहे. रक्ताळलेल्या जगाने नवी साम्राज्ये, नवे धर्म आणि वैयक्तिक अपेक्षांना बदलविले आहे. केवळ हेच नव्हे तर सामाजिक, राजकीय दिशाही या लढायांनी बदलविल्या आहेत. भारतीय इतिहास देखील यात मागे नाही. अशा अनेक लढाया झाल्या यामुळे भारतीय इतिहास बदलला गेला. अशाच लढायांची माहिती या ठिकाणी देत आहोत. भारतामध्ये शतकानुशतके विविध साम्राज्ये राहिली आहेत. चंद्रगुप्त मौर्य, अशोक, समुद्रगुप्त, हर्षवर्धन, पृथ्वीराज चौहान आणि अकबर यांनी बाहेरुन झालेले आक्रमण थोपविण्यासाठी प्रयत्न केले.

युद्ध हे नेहमीच मानवी इतिहासाचे अंतरंग राहिले आहे. रक्ताळलेल्या जगाने नवी साम्राज्ये, नवे धर्म आणि वैयक्तिक अपेक्षांना बदलविले आहे. केवळ हेच नव्हे तर सामाजिक, राजकीय दिशाही या लढायांनी बदलविल्या आहेत. भारतीय इतिहास देखील यात मागे नाही. अशा अनेक लढाया झाल्या यामुळे भारतीय इतिहास बदलला गेला. अशाच लढायांची माहिती या ठिकाणी देत आहोत. भारतामध्ये शतकानुशतके विविध साम्राज्ये राहिली आहेत. चंद्रगुप्त मौर्य, अशोक, समुद्रगुप्त, हर्षवर्धन, पृथ्वीराज चौहान आणि अकबर यांनी बाहेरुन झालेले आक्रमण थोपविण्यासाठी प्रयत्न केले. ११९२ साली दिल्लीचा राजा पृथ्वीराज चौहान आणि घोरचा सुलतान मोहम्मद घोरी यांच्यात लढाई झाली. भारताला तीन वेळा लुटलेल्या घोरीने चौहानना आव्हान दिले. ११९१ साली पृथ्वीराज चौहाननी त्याचा पराभव केला. अफगाणिस्तानला परत गेलेल्या घोरीने ११९२ साली प्रचंड सैन्यासह आक्रमण करीत पुन्हा आव्हान दिले. राजपूत सैन्यात असलेल्या समन्वयाच्या अभावामुळे तसेच इतर राजपूत राजांकडून मदत न मिळाल्याने पृथ्वीराज चौहान पराभूत झाले. त्यानंतर भारतात इस्लामचा उदय झाला. घोरीने साम्राज्य उभे केले. कतुब-उल-दिन ऐबकची नियुक्ती केली. पुढे त्यानेच कुतुब मिनार उभारला. त्यानंतर दिल्लीवर सल्तनत आली.१५२६ साली दिल्लीचा सुल्तान इब्राहीम लोधी आणि फरगाना येथून आलेल्या बाबर यांच्यात घनघोर युद्ध झाले. काही जणांच्या मते इब्राहीम लोधीचा भाऊ सिकंदर आणि मेवाडचा राजा राणा सांगा यांनी त्याला बोलाविले. बाबरला भारत खूपच आवडला. सुलतानचा पराभव करुन तो येथेच राहिला. त्याने मुघल साम्राज्याची स्थापना केली. १५२७ साली बाबरने खानवा युद्धात राणा सांगाचा पराभव केला. १५५६ साली पानिपतच्या दुसºया युद्धात बाबरचा नातू अकबरने हेमूचा पराभव करीत दिल्लीवर आपली हुकुमत गाजविली.२३ जून १७५७ साली बंगालचा नवाब सिराज उद्दौला आणि ब्रिटीश यांच्यात लढाई झाली. नवाबच्या परवानगीशिवाय ब्रिटीशांनी कोलकाता येथील फोर्ट विल्यमचा ताबा घेतल्यानंतर वातावरण तापले. मद्रास प्रांताचे ब्रिटीश कमांडर रॉबर्ट क्लाईव्ह यांनी नवाबच्या सैन्यातील मीर जाफरला लाच दिली. यामुळे नवाबचे ४० हजार सैनिक काहीही करु शकले नाही. केवळ तीन हजार सैनिक असणाºया ब्रिटीशांकडून नवाबला पराभव पत्करावा लागला. यामुळे भारतावर राज्य करण्याचे ब्रिटीशांचे स्वप्न साकार झाले. मुघल साम्राज्य ताब्यात घेतल्यानंतर मराठा, म्हैसूरचा राजा टिपू सुलतान आणि इतरांना त्यांनी पराभूत केले.१४ जानेवारी १७६१ साली मराठा आणि अफगाणचा अहमद शाह अब्दाली यांच्यात युद्ध झाले. मुघलांनंतर कोण यासाठी ही लढाई होती. सदाशिवराव भाऊ यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैनिक लढले. राजपूत, सीख, जाट, अवधचा नवाब यांची मदत न मिळाल्याने मराठा सैनिकाची मोठी हानी झाली. राजधानी पुण्यापासून हजारो मैलावर हे सैन्य लढत होते. अनेक सैनिक उपाशीपोटी मरण पावले. अब्दालीने सैनिकांची सर्व रसद बंद केली. सुरुवातीला मराठ्यांचे आक्रमण जोरदार होते, मात्र अब्दालीने आक्रमण करीत मराठ्यांचा पराभव केला.२२ आॅक्टोबर १७६४ साली पाटण्यापासून १३० कि. मी. अंतरावर असलेल्या बक्सर येथे हेक्टर मुनरोच्या नेतृत्वाखालील ब्रिटीश सैन्य आणि मुगल सम्राट शाह आलम दुसरा, अवधचा नवाब शुजाउद्दौला, बंगालचा नवाब मीर कासीम यांच्या सैन्यात लढाई झाली. भारतीयांच्या बाजूला ४० हजारांचे सैन्य होते, त्यावेळी ब्रिटीशांकडे केवळ १०,००० सैनिक होते. तरीही भारतीयांना पराभव पत्करावा लागला. अलाहाबाद करारानुसार मुघल सम्राटला मोठा फटका बसला. या लढाईनंतर ब्रिटीशांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. १८५७ पर्यंत त्यांनी सर्व सम्राटांना पराभूत केले होते.