Join us  

Paatal Lok 2 :  ‘पाताल लोक 2’ कधी येणार? ‘हाथीराम चौधरी’ने दिली गुडन्यूज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2022 5:04 PM

Patala Lok 2 : ‘पाताल लोक’  रिलीज झाल्यानंतर लगेच या सीरिजच्या सेकंड सीझनची मागणी चाहत्यांनी लावून धरली होती. तुम्हीही या सीरिजचा दुसरा सीझन पाहण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे.

अनुष्का शर्मा व तिचा भाऊ कर्णेश शर्मा यांची निर्मिती असलेली ‘पाताल लोक’ (Paatal Lok ) ही क्राईम-थ्रीलर सीरिज प्रचंड गाजली होती. सिरिजचा पहिला सीझन 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता. पहिला सीझन रिलीज झाल्यानंतर लगेच या सीरिजच्या सेकंड सीझनची मागणी चाहत्यांनी लावून धरली होती. तुम्हीही या सीरिजचा दुसरा सीझन पाहण्यास उत्सुक असाल तर तुमच्यासाठी एक गुडन्यूज आहे.   ‘पाताल लोक 2’ (Paatal Lok 2 ) लवकरच येणार आहे. लवकरच या सीरिजच्या दुसऱ्या सीझनचं शूटींग सुरू होणार असल्याचा दावा केला गेला आहे. आता या बातमीत किती तथ्य आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचंही उत्तर आहे. ‘हाथीराम चौधरी’ने स्वत: ही बातमी कन्फर्म केली आहे. होय, सीरिजमध्ये हाथीराम चौधरीची भूमिका साकारणारा अभिनेता जयदीप अहलावत (Jaideep Ahalawat) यांनी  एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘पाताल लोक 2’बद्दल खुलासा केला आहे.   

‘पाताल लोक 2’चं शूटींग नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. आम्ही 10 दिवसांनी शूटिंग सुरू करणार आहोत. त्यानंतर साधारण चार-साडेचार महिने या सिरीजचं काम चालेल. सीरिजचा दुसरा सीझन खूप सुंदर होणार आहे. कारण कथा अतिशय सुंदर आहे. मी तितक्याच प्रामाणिकपणे माझी भूमिका साकारण्याचा प्रयत्न करणार आहे, असंही ते म्हणाले.‘पाताल लोक’ या वेबसीरिजमध्ये जयदीप अहलावत मुख्य भूमिकेत होते. याशिवाय  नीरज काबी, इश्वाक सिंग, अभिषेक बॅनर्जी  वस्तिका मुखर्जी, गुल पनाग, विपिन शर्मा, आकाश खुराणा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.  ही वेबसीरिज हाथीराम चौधरी या एका पोलिस अधिका-याची कथा आहे.    दिल्लीत यमुनाच्या पूलावर चार आरोपींना पकडले जाते. यांच्यावर एका टॉपचा पत्रकार व न्यूज अँकर संजीव मेहरा (नीरज काबी)च्या मर्डरचा कट रचल्याचा आरोप असतो. हे प्रकरण पोलीस  हाथीराम चौधरी (जयदीप अल्हावत)ला दिले जाते.  हाथीराम  पोलीस ठाण्यात काम करणारा साधारण पोलीस असतो. पण या एका प्रकरणाच्या निमित्ताने हाथीरामला आता स्वत:ला सिद्ध करायचं असतं. मी हिरो आहे, हे पोलिस डिपार्टमेंटलाच नाही तर स्वत:च्या कुटुंबालाही त्याला दाखवून द्यायचं असतं. तो यात यशस्वी होतो की नाही, हे पाहण्यासाठी तुम्हाला ही वेबसीरिज बघावी लागेल.

इतकी घेतली फी...‘पाताल लोक 2’साठी जयदीप यांनी मानधनात चांगलीच वाढ केल्याची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, ‘पाताल लोक’साठी त्यांनी 40 लाख रूपये फी घेतली होती. पण दुसऱ्या सीझनसाठी त्यांनी 20 कोटी रूपये मानधन घेतल्याचं कळतंय.  हा सीझन पुढील वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येईल.जयदीप अहलावत सध्या सुजॉय घोष यांच्या ‘द डिवोशन ऑफ सस्पेक्ट एक्स’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहेत. हा सिनेमा हातावेगळा करताच ते ‘पाताल लोक 2’मध्ये बिझी होतील.

टॅग्स :पाताल लोकवेबसीरिजअनुष्का शर्मा