Join us  

पहिल्या भेटीतच नर्गीस यांच्या प्रेमात पडले होते राज कपूर, का अर्धवट राहिली त्यांची प्रेमकहाणी?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2018 10:59 AM

या दोघांच्या सिनेमातील लव्हस्टोरी सोबतच रिअल लाईफमधील लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली. पण या दोघांची लव्हस्टोरी पूर्ण का होऊ शकली नाही. त्यांच्यात असं काय झालं की, त्यांना वेगळं व्हावं लागलं चला जाणून घेऊया....

मुंबई : बॉलिवूडच्या सर्वात सुपरहिट जोड्यांमध्ये राज कपूर आणि नर्गीस दत्त यांची जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. या दोघांच्या सिनेमातील लव्हस्टोरी सोबतच रिअल लाईफमधील लव्ह स्टोरीही चांगलीच गाजली. पण या दोघांची लव्हस्टोरी पूर्ण का होऊ शकली नाही. त्यांच्यात असं काय झालं की, त्यांना वेगळं व्हावं लागलं चला जाणून घेऊया....

राज कपूर आणि नर्गीस दत्त यांची लव्हस्टोरी फारच गाजली. अनेकांनी यावर खूपकाही लिहिलं आहे. नर्गीस दत्त यांनी मुख्य अभिनेत्री म्हणून 1942 मध्ये तमन्ना या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर त्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट सिनेमे दिले. 

नर्गीस आणि राज यांची पहिली भेट 

या दोघांची पहिली भेटही एखाद्या फिल्मी सीनसारखीच झाली होती. असे म्हणतात की, कामानिमित्त एकदा राज कपूर नर्गीस दत्त यांच्या आई जद्दन बाईकडे गेले होते. त्यावेळी त्या घरी नव्हत्या, नर्गीस तेव्हा एकट्याच घरी होत्या आणि भजी तळत होत्या. जेव्हा त्यांनी दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या हाताला बेसन लागले होते. त्यांच्या चेहऱ्यावरही बेसन लागलं होतं. त्यावेळीच नर्गीस यांची सुंदरता राज कपूर यांनी प्रेमात पाडून गेली. 

सुपरपहिट जोडी

राज कपूर आणि नर्गीस यांची जोडी 1940 ते 1960 दरम्यान सर्वात जास्त गाजली. राज कपूर आणि नर्गीस यांनी एकूण 16 सिनेमांमध्ये काम केलं. यातील 6 सिनेमे आरके बॅनरचे होते. आजही या जोडीचे सिनेमे आवडीने बघितले जातात. 

नर्गीस यांनी विकले होते दागिने

असे सांगितले जाते की, आवारा सिनेमातील एका गाण्याच्या शूटसाठी राज कपूर यांनी 8 लाक रुपये खर्च केले होते. तर सिनेमाचं बजेट 12 लाख रुपये होतं. पूर्ण बजेट ओव्हरबजेट झालं. त्यामुळे नर्गीस यांनी आपले दागिने विकून राज कपूर यांना मदत केली होती. आरके बॅनर हे राज कपूर आणि नर्गीस यांचं होतं. हे त्यांचं प्रेमच होतं की, नर्गीस यांनी अशाप्रकारे राज कपूर यांची मदत केली होती. 

नर्गीसनंतर दु:खी झाले होते राज

जेव्हा नर्गीस यांना कळाले की, राज कपूर हे कधीही त्यांच्या लग्न करणार नाही, जेव्हा नर्गीस यांनी त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केले. राज कपूर यांना जेव्हा कळाले की, नर्गीस यांनी सुनील दत्त यांच्याशी लग्न केले तेव्हा राज कपूर यांना मोठा धक्का बसला. मीडिया रिपोर्टनुसार राज कपूर मित्रांसमोर रडू लागले होते. इतकेच नाहीतर त्यांनी स्वत:ला सिगारेटचे चटके दिले होते, हे जाणून घेण्यासाठी की, असं खरंच घडलं आहे. 

काय होतं दूर जाण्याचं कारण

राज कपूर गे नर्गीस यांना भेटण्याआधीच विवाहित होते. त्यामुळे त्यांनी नर्गीस यांच्याशी लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा नर्गीस 19 वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचं नातं राज कपूर यांच्याशी जुळलं होतं. असे सांगितले जाते की, एकदा राज कपूर हे त्यांच्या पत्नी कृष्णा यांना हार घालत असताना नर्गीस यांनी पाहिलं. आणि त्यावेळीच त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. 

ऋषी कपूरने या प्रेमाचा केला होता खुलासा

अभिनेते ऋषी कपूर यांनी आपली बायोग्राफी खुल्लम खुल्ला - ऋषी कपूर अनसेंसर्ड मध्ये राज कपूर आणि नर्गीस दत्त यांच्या नात्याबाबत खुलासा केला होता. त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, त्यांच्या वडीलांना सिनेमा, दारू आणि बॉलिवूडच्या मुख्य अभिनेत्री सोबत प्रेम होतं.

टॅग्स :नर्गिसराज कपूर