Join us  

प्रेमाची गोष्ट सांगणाऱ्या 'प्रेमवारी'चा मुहूर्त संपन्न,नयनरम्य स्थळांचा घडणार दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2018 4:11 AM

'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका नव्या रुपात मोठ्या पडद्यावर ...

'प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं', प्रेमाची हि कधीच न बदलणारी संकल्पना एका नव्या रुपात मोठ्या पडद्यावर सादर होत आहे. सैमामित प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित 'प्रेमवारी' या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या आगामी सिनेमाबाबत जास्त माहिती माहिती हाती आली नसली तरी, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असल्याचे समजते. या सिनेमाच्या चित्रीकरणाला सध्या सुरुवात झाली असून, अहमदनगर येथील कोपरगाव तालुक्यातील वारी गावात या सिनेमाचा उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते मुहूर्त करण्यात आला. या सिनेमात कोणकोणते कलाकार झळकणार आहेत याविषयी लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.सिनेमाच्या एका पोस्टर दोन प्रेमीयुगुल बसल्याचे दाखवण्यात आले असून नेमके हे कलाकार कोण याविषयी कमालीची गुप्तता ठेवण्यात आली आहे.नुकत्याच झालेल्या  या शुभारंभ कार्यक्रमात कोपरगावचे शिवसेना तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, अहमदनगरचे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद लबडे, संजीवनी कोलेज ऑफ इंजिनीरचे डिरेक्टर सुनील कोल्हे, शिर्डी नगराध्यक्ष अभय भैय्या शेळके आणि शिर्डी संस्थान सदस्य सचिंत तांबे आदी. मान्यवर उपस्थित होते. एक सुंदर प्रेमकथा घेऊन येणाऱ्या या सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, निर्माते आणि प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. या सिनेमातील प्रमुख कलाकारांबाबत तूर्तास मौन बाळगण्यात आले आहे. 'प्रेमवारी' हा चित्रपट प्रेमाच्या गुलाबी दुनियेची सफर घडवून आणण्यास लवकरच येत आहे.  प्रेम, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा या चित्रपटाच्या कथेप्रमाणे शूटिंग लोकेशनवर खूप मेहनत घेण्यात आली आहे.त्यामुळे चित्रपटात नयनरम्य स्थळही रसिकांना भुरळ पाडतील यात काही शंकाच नाही.नक्कीच चित्रपटात डोळे दिपवणा-या आणि प्रेमात पाडणा-या अशा अनेक गोष्टी आहेत असे चित्रपटाच्या टीमने आपले मत व्यक्त केले आहे.आजपर्यंत मराठी चित्रपटात  एकाहून एक सरस आणि हिट चालींनी परिपुर्ण असलेल्या गाण्यांनी संगीतप्रेमींना अक्षरक्षा याड लावलंय.त्यामुळे चित्रपटातही अशीच काहीशी खास गाणीही संगीतप्रेमींना ऐकायला मिळणार असल्याचे कळतंय.