Join us  

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहानी...!, हे आहेत मराठी सिनेइंडस्ट्रीतील चर्चित घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 7:00 AM

मराठी सिनेइंडस्ट्रीत असेही काही जोडपे आहेत ज्यांनी अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला.

रितेश-जेनिलिया, सिद्धार्थ -मिताली, प्रिया -उमेश अशा मराठी सिनेइंडस्ट्रीतील अनेक जोड्या या चाहत्यांच्या फेव्हरिट जोड्या आहेत. या जोड्यांनी लग्नगाठ बांधत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पण मराठी सिनेइंडस्ट्रीत असेही काही जोडपे आहेत ज्यांनी अचानक वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. 

तेजश्री प्रधान आणि शशांक केतकर

होणार सून मी या घरची मालिकेतील श्री आणि जान्हवीनं म्हणजेच शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांनी मालिका यशाच्या शिखरावर असताना लग्नगाठ बांधली आणि चाहत्यांना सुखद धक्का दिला होता. पण लग्नानंतर वर्षभरातच दोघांमध्ये खटके उडण्यास सुरुवात झाली आणि त्यांनी नंतर घटस्फोटाचा निर्णय घेतला. चाहत्यांसाठी हा घटस्फोट धक्कादायक होता.

अनिकेत विश्वासराव-स्नेहा चव्हाण 

अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्याविरोधात त्याची पत्नी अभिनेत्री स्नेहा चव्हाणने पोलिसांत तक्रार दाखल केल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली आणि एकच खळबळ उडाली. स्नेहाने अनिकेतवर मानसिक तसेच शारिरीक छळ केल्याचा आरोप केलाय. अनिकेत आणि स्नेहाचे लग्न २०१८ मध्ये झाले होते. फेब्रुवारी २०२१ मध्ये स्नेहा माहेरी परतली. यानंतर हे वेगळे झालेत.

सई ताम्हणकर आणि अमेय गोसावी 

अभिनेत्री सई ताम्हणकरचे लग्न झाले आहे ही गोष्ट तुम्हाला क्वचितच माहित असेल. सई आणि अमेय गोसावी यांचे लग्न १५ डिसेंबर २०१३ ला झाले होते. अमेय हा देखील प्रोड्युसर असून त्याची लोडिंग पिक्चर्स नावाची कंपनी आहे. सई आणि अमेय हे दोघे एकाच क्षेत्रातील असले तरी पण दोघांनी कधी एकत्र काम केलेले नाही. सई आणि अमेय यांचे लव्ह मॅरेज होते.  तीन वर्षांच्या रिलेशनशीपनंतर त्यांनी लग्न केले होते. पण त्या दोघांनी अचानक घटस्फोट घेत चाहत्यांना धक्का दिला. 

​स्वप्नील जोशी आणि अपर्णा

स्वप्नील जोशीचे पहिले लग्न अपर्णासोबत झाले होते. या दोघांचे लव्ह मॅरेज होतं. मात्र फार काळ हे नाते टिकू शकले नाही. लग्नाच्या केवळ चार वर्षांत स्वप्नील आणि अपर्णा विभक्त झाले. २०११ मध्ये स्वप्नीलनं लीनासोबत पुन्हा एकदा विवाहगाठ बांधली.

​पियुष रानडे आणि शाल्मली टोळे

अभिनेता पियुषचे पहिलं लग्न टीव्ही अभिनेत्री शाल्मली टोळेसोबत झाले होते. २०१०मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले होते. मात्र फार काळ हे नाते टिकले नाही. दोघे कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. शाल्मलीपासून विभक्त झाल्यानंतर अस्मिता या मालिकेच्या सेटवर मयुरीसोबत पियुषचे सुत जुळले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या नात्याचे रुपांतर या दोघांनी लग्नात करण्याचा निर्णय घेतला. पण मयुरी आणि पियुष या दोघांनीही लवकरच वेगळं होण्याचा निर्णय घेतला...या वर्षी दोघांचा घटस्फोट झाला. 

पल्लवी पाटील-संग्राम समेळ 

अभिनेता संग्राम समेळने श्रद्धा फाटकसोबत लग्नाचे फोटो शेअर केले आणि चाहत्यांना धक्काच बसला... कारण संग्रामचे अभिनेत्री पल्लवी पाटील सोबत लग्न झाले होते. संग्रामच्या लग्नाच्या फोटोंमुळे हे दोघ विभक्त झाल्याचे स्पष्ट झाले.

​रेशम टिपनीस आणि संजीव सेठ

अभिनेत्री रेशम टिपनीसचे बिग बॉसच्या घरात राजेश श्रृंगारपुरेसोबत नाव जोडले गेले. परंतू खऱ्या आयुष्यात ती संदेश किर्तीकरला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. रेशम व संदेश यांनी लग्न केले नसले तरी देखील त्यांच्या सोशल मीडियावर एकत्र फोटो पहायला मिळतात. रेशमचं पहिले लग्न अभिनेता संजीव सेठसोबत झाले होते. लग्नाच्या वेळी रेशम २० तर संजीव सेठ ३२ वर्षांचे होते. लग्नाच्या वर्षभरातच रेशमने मुलगी रिशिकाला जन्म दिला होता. काही वर्षानंतर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. तिची मुलगी आता २३ वर्षांची आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान सई ताम्हणकरस्वप्निल जोशीरेशम टिपणीसपियुष रानडेसंग्राम समेळपल्लवी पाटील