Join us  

असं काय झालं की, अनिल आणि बोनी कपूर यांच्यात झाली होती खडाजंगी; वाचा काय आहे प्रकरण!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2020 5:28 PM

तुम्हाला ठाऊक नसेल की, या दोघांत एकदा चांगलीच खडाजंगी झाली होती. कशामुळे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल.

बॉलिवूडचे दोन दिग्गज म्हणजेच निर्माता बोनी कपूर आणि अभिनेता अनिल कपूर. या दोन्ही भावांचे करिअर कुठल्याही वादाशिवाय एकदम व्यवस्थितपणे झाले असे मानले जाते. पण, तुम्हाला ठाऊक नसेल की, या दोघांत एकदा चांगलीच खडाजंगी झाली होती. कशामुळे? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, याचं कारण स्वत: अभिनेत्री श्रीदेवी या होत्या. या दोघांमधील भांडण एवढे वाढले की, रागाच्या भरात अनिल कपूर हे ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाचे शूटिंग अर्धवट सोडून निघून गेले होते. काय आहे किस्सा? वाचा मग...

सुत्रांनुसार, जेव्हा बोनी कपूर मिस्टर इंडियाच्या प्रोडक्शनमध्ये खूप बिझी होते, ही घटना तेव्हाची आहे. या चित्रपटात श्रीदेवींनी मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारावी असं बोनी कपूर यांना वाटत होतं. मात्र श्रीदेवींनी त्यांची ही ऑफर  धुडकावून लावली. नंतर त्यांनी या चित्रपटासाठी खूप मोठी रक्कम मानधन म्हणून मागितली. त्यावेळी श्रीदेवी १० लाख रुपये चित्रपटाचं मानधन म्हणून मागितलं होतं आणि ही गोष्ट बोनी कपूर यांना समजली तेव्हा ते त्यांना ११ लाख रुपये मानधन देण्यास तयार झाले. त्यावेळेच्या हिशोबानं ही रक्कम खूप मोठी होती.

बोनी कपूर यांच्या या निर्णयाबाबात जेव्हा अनिल कपूर यांना समजलं तेव्हा त्यांना खूप राग आला. त्यावेळी अनिल कपूर यांनी सुद्धा या सिनेमासाठी आपला पैसा लावला होता. त्यामुळे ते प्रत्येक अनावश्यक खर्चाबद्दल खूप जागरुक होते. त्यांना जेव्हा श्रीदेवींच्या फीबद्दल समजलं. तेव्हा त्यांना राग अनावर झाला. हे सर्व घडलं त्यावेळी श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यात ब्रेकअप झालं होतं. दुसरीकडे श्रीदेवींची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची झाली होती. त्यांच्या आईची तब्येत सुद्धा खूप बिघडली होती आणि श्रीदेवींचा सर्वात जास्त पैसा हा त्यांच्या आजारपणासाठीच्या उपचारांमध्ये जात होता. हे सर्व बोनी कपूर यांना समजलं तेव्हा त्यांनी श्रीदेवींच्या आईच्या उपचारांची पूर्ण जबाबदारी घेतली. श्रीदेवी आणि त्यांच्या आईचं अमेरिकेचं तिकिट बुक करून त्यांना उपचारांसाठी पाठवून दिलं. या सवार्ची माहिती अनिल कपूर यांच्या मिळाली आणि त्यांनी मिस्टर इंडियाचा सेट सोडून निघून गेले.

त्यावेळी अशी परिस्थिती झाली होती की, अनिल कपूर यांनी सिनेमा जवळजवळ सोडल्यात जमा होता. पण नंतर जेव्हा दिग्दर्शक शेखर कपूर यांनी त्यांच्याशी बोलणं केलं तेव्हा त्यांनी सिनेमात परत येण्यासाठी काही अटी ठेवल्या. त्यातली महत्त्वाची अट ही होती ती ते प्रॉडक्शनचं काम सोडून देतील. पण सिनेमा रिलीज झाल्यानंतर अनिल कपूर यांनी नफ्यातील मोठ्या रकमेवर दावा केला होता.

टॅग्स :अनिल कपूरबोनी कपूर