Join us  

‘सीक्रेट वेडिंग’साठी विराट कोहली बनला होता ‘राहुल’! अनुष्का शर्माने केला खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2019 12:47 PM

डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली. याच सीक्रेट वेडिंगबद्दलचा एक खास खुलासा अनुष्काने केला आहे.

ठळक मुद्दे अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी २०१३ मध्ये सुरु झाली होती.

अनुष्का शर्माने हिंदी चित्रपटसृष्टीत दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून अनुष्काने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आणि त्यानंतर एकदाही मागे वळून पाहिले नाही. डिसेंबर २०१७ मध्ये अनुष्काने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीसोबत लग्नगाठ बांधली. या सीक्रेट मॅरेजची तेव्हा बरीच चर्चा झाली. याच सीक्रेट वेडिंगबद्दलचा एक खास खुलासा अनुष्काने केला आहे. होय, ‘वोग’ या जगप्रसिद्ध मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत अनुष्का तिच्या व विराटच्या सीक्रेट वेडिंगबद्दल बोलली.

आम्हाला एक कौटुंबिक विवाह सोहळा हवा होता. आमच्या लग्नात केवळ ४२ पाहुणे होते. केवळ आमचे कुटुंबीय व अतिशय जवळचे मित्र. मला सेलिब्रिटी वेडिंग नको होते. त्यामुळेच आम्ही सीक्रेट वेडिंगचा बेत आखला. हे वेडिंग इतके सीक्रेट होते की, केटररला आम्ही आमची खोटी नावे सांगितली होती. मला आठवते,विराटने त्याचे नाव राहुल सांगितले होते, असा खुलासा अनुष्काने यावेळी केला.

अनुष्का व विराटने आपले प्रेमही अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवले होते. सुमारे ४ वर्षे डेट केल्यावर दोघांनीही लग्न केले होते. पण या रिलेशनशिपची भनकही कुणाला नव्हती. त्यामुळेचं दोघांच्याही लग्नाचा पहिला फोटो समोर आला, तेव्हा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. अनुष्का आणि विराटची लव्हस्टोरी २०१३ मध्ये सुरु झाली होती. यशाच्या शिखरावर असलेल्या अनुष्का आणि विराटला एका कंपनीने जाहीरातीसाठी एकत्र कास्ट केले होते. असे म्हणतात की, दोघांची मैत्री इथूनच सुरु झाली. पुढे हीच मैत्री हळूहळू प्रेमात रुपांतरित झाली. तेव्हापासून दोघांच्या प्रेमाचे किस्से रंगू लागले. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीविराट अनुष्का लग्न