Join us  

वडिलांचा तो सल्ला कायम लक्षात ठेवतो- वरूण धवन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 9:37 PM

आज लोकमतच्या कार्यक्रमातील अनुष्का व वरूणची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी बोलताना वरूण धवनने वडिलांनी त्याला दिलेला कानमंत्र कुठला ते सांगितले.

 ‘सुईधागा’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांनी आज लोकमतच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. स्व:कर्तृत्वाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या व समाजात परिवर्तन घडवून आणणा-या विविध क्षेत्रातील महिला उद्योजिकांचा आज लोकमततर्फे सन्मान करण्यात आला. जुहू येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगलेल्या या कार्यक्रमातील अनुष्का व वरूणची उपस्थिती लक्षवेधी ठरली. यावेळी बोलताना वरूण धवनने वडिलांनी त्याला दिलेला कानमंत्र कुठला ते सांगितले. ‘शूटींगवेळी प्रत्येक शॉट शेवटचा शॉट समज’, असा सल्ला मला पापांनी दिला होता. पापांचा हा सल्ला मी कधीच विसरत नाही, असे वरूणने यावेळी सांगितले.करिअरबद्दल बोलताना, ‘मैं तेरा हिरो’ आणि ‘बदलापूर’ हे दोन्ही चित्रपट माझ्या करिअरमधील टर्निंग पॉर्इंट ठरलेत, असे वरूण यावेळी म्हणाला. लोकमतच्या व्यासपीठावर अशा धडाधडीच्या महिला उद्योजिकांना भेटता आले, याबद्दल वरूणने लोकमतचे विशेष आभार मानलेत. आपल्या कर्तृत्वाने, मेहनतीने जग घडवू पाहणा-या महिला उद्योजिकांना भेटण्यापेक्षा दुसरी मोठी संधी नाही, त्याहून मोठा आनंद नाही़. याबद्दल लोकमतचे मी मनापासून आभार मानतो, असे वरूण यावेळी म्हणाला.अनुष्का व वरूणचा ‘सुईधागा’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या चित्रपटात अनुष्काने ममताची तर वरूणने मौजीची भूमिका साकारली आहे. ममता व मौजी अनेक खस्ता खात स्वत:चा उद्योग उभा करतात.  चित्रपटात वरुण धवन आणि अनुष्का शर्मा पती-पत्नीच्या भूमिकेत आहेत.   मौजी हा लहान-मोठी नौकरी करत असतो, त्याला मालकाकडून अनेक वेळा अपमानाचा सामना करावा लागतो. तर ममता गृहिणी आहे. नव-याच्या सततच्या अपमानामुळे व्यस्थित ममता त्याला नोकरी सोडून स्वत:चे काम करण्याचा सल्ला देते. मौजी नोकरी सोडतो आणि शिलाईचा व्यवसाय उघडतो. यामध्ये ममता त्याची मदत करते. 

 

टॅग्स :वरूण धवनसुई-धागा