Join us  

​‘वरदा’चा रजनीकांतच्या ‘2.0’ तडाखा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2016 11:51 AM

‘वरदा’ या चक्रीवादळाने गत आठवड्यात चेन्नईसह तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीला धडक दिली. या चक्रीवादळाने तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत केले. मेगास्टार रजनीकांत ...

‘वरदा’ या चक्रीवादळाने गत आठवड्यात चेन्नईसह तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीला धडक दिली. या चक्रीवादळाने तामिळनाडूतील जनजीवन विस्कळीत केले. मेगास्टार रजनीकांत यांनाही या वादळाचा तडाखा बसला. होय, रजनीकांत आणि अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘2.0’ या चित्रपटाच्या सेटचे ‘वरदा’मुळे बरेच नुकसान झाले. वादळा्च्या तडाख्यामुळे चित्रपटाच्या शूटींगचा पार खोळंबा झाला.चेन्नईतील अम्बत्तूर येथील आयटीपार्कमध्ये या चित्रपटाचे शूटींग होणार होते. याची संपूर्ण तयारी झाली होती. मात्र ‘वरदा’ने आपल्यासोबत सगळेच वाहून नेले. या आयटीपार्कमध्ये अनेक चित्रपटाचे शूटींग होते. ‘रोबोट’या चित्रपटाचा सीक्वल असलेल्या ‘2.0’ च्या काही भागांचे शूटही याठिकाणी होणार होते. यासाठी सेट उभारण्यात आला होता. रविवारी नियोजित कार्यक्रमानुसार याठिकाणी शूटींगही झाले. पण सोमवारी ‘वरदा’ने धडक दिली आणि ‘2.0’च्या क्रू मेंबर्सला आपला गाशा गुंडाळावा लागला.  क्रू मेंबर्सनी आपल्यापरिने सेट वाचवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाºयापुढे त्यांचे काहीच चालले नाही.आता ‘वरदा’चा जोर ओसरल्यानंतर सेटची दुरूस्ती सुरु आहे. यानंतर चित्रपटाचे उर्वरित शूटींग पूर्ण होणार आहे. शंकर दिग्दर्शित  ‘2.0’ मध्ये रजनीकांतसोबत अक्षय कुमार आणि एमी जॅक्सन हे प्रमुख भूमिकेत आहेत. अक्षय यामध्ये खलनायक साकारला असून पुढील वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘रोबोट’प्रमाणे या चित्रपटाचे संगीतसुद्धा ए. आर, रहमान देणार असून यामध्ये केवळ एकच गाणे आहे.