Join us  

तनुश्री दत्ता मुंबईत परतली, पण बॉलिवूडमध्ये परतणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 8:22 PM

‘मिस इंडिया’ राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता आजकाल कुठेही नाही. पण काही तासांपूर्वी ती मुंबई एअरपोर्टवर दिसली अन् सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले. 

‘मिस इंडिया’ राहिलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता आजकाल कुठेही नाही. पण काही तासांपूर्वी ती मुंबई एअरपोर्टवर दिसली अन् सगळे कॅमेरे तिच्याकडे वळले. खरे तर तनुश्रीला आता ओळखणेही कठीण झाले आहे. इतकी ती बदलली आहे. ‘आशिक बनाया आपने’ या चित्रपटात तनुश्री बोल्ड रूपात दिसली. यानंतरच्या काही चित्रपटांतही तिचा बोल्ड अंदाजचं चर्चेचा विषय ठरला. पण यानंतर कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तनुश्रीने अचानक बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला.

 बॉलिवूड सोडून ती अध्यात्माच्या वाटेवर निघाली. तिने हा निर्णय का घेतला, हे कुणालाच कळले नाही. मन:शांतीच्या शोधात तनुश्री अनेक ठिकाणी फिरली. पुढे युएसमध्ये गेली. पण इथून परतली तेव्हा ती पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली होती. याकाळात तिच्या एका मित्राने तिला योगविद्येशी जुळण्याचा सल्ला दिला. पण इथेही तिचे मन रमले नाही. मग तिने लडाखचा मार्ग जवळ केला. डोक्याचे मुंडण सुद्धा करून घेतले. 

यापश्चात अनेक आश्रमात ती राहिली. पुढे अचानक ख्रिश्चन धर्म स्वीकारला. या सगळ्या प्रवासात तनुश्रीला किती मन:शांती मिळाली माहित नाही. पण आज मुंबई विमानतळावर तनुश्रीच्या चेहऱ्यावर प्रसन्न हास्य होते. मीडियाला व्हिक्ट्रि साईन दाखवत ती विमानतळाबाहेर आली. तिचे वजन काही अंशी वाढलेले दिसले तरी तिच्या चेह-यावरची प्रसन्नता बरेच काही सांगणारे होती. कदाचित सगळ्या दु:खातून मी बाहेर पडले, हे दर्शवणारे होते.काही महिन्यांपूर्वी तनुश्रीची बहीण इशिता दत्ता हिचे लग्न झाले. या लग्नाला तनुश्री हजर नव्हती. पण अचानक ती मुंबईला परतली. यामागचे कारण तूर्तास तरी आम्हाला ठाऊक नाही. बॉलिवूडमध्ये तनुश्री कमबॅक करणार का, हेही ठाऊक नाही. पण मुंबईत परण्यासोबतचं ती बॉलिवूडमध्ये परतणार असेल तर चाहते तिचे नक्कीच स्वागत करतील, हे मात्र आम्हाला ठाऊक आहे.