Join us  

ऐश्वर्याच्या सौंदर्यामुळे सुश्मिता सेनला भरली होती धडकी?; मिस इंडिया स्पर्धेचा फॉर्म घेतला होता मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2023 11:04 AM

Sushmita sen: ऐश्वर्या राय मिस इंडियाच्या स्पर्धत सहभागी झालीये हे ऐकल्यावर सुश्मिताने तिचा फॉर्म मागे घेतला होता.

बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन (sushmita sen) कायम तिच्या उत्तम अभिनयशैली आणि बेधडक पर्सनालिटीमुळे चर्चेत येत असते. सध्या सुश्मिता तिच्या 'आर्या 3' या वेबसीरिजमुळे चर्चेत येत आहे. या सीरिजच्या माध्यमातून पुन्हा एका प्रेक्षकांना सुश्मिताचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळाला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुश्मिता सिनेसृष्टीवर राज्य करत आहे. त्यामुळे दमदार अभिनयशैली आणि सौंदर्य यांच्या जोरावर ती अनेक अभिनेत्रींना टफ फाइट देते. परंतु, एक काळ असा होता जेव्हा ऐश्वर्या रायच्या (aishwarya rai) सौंदर्यामुळे तिला धडकी भरली होती. इतकंच नाही तर फक्त ऐश्वर्या राय मिस इंडियाच्या स्पर्धत सहभागी झालीये हे ऐकल्यावर सुश्मिताने तिचा फॉर्म मागे घेतला होता.

१९९४ मध्ये ऐश्वर्या राय आणि सुश्मिता सेन या दोघींनी मिस इंडिया स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याकाळी ऐश्वर्या रायच्या सौंदर्याची चर्चा पार सातासमुद्रापार पोहोचली होती. त्यामुळे जवळपास २५ मुलींनी या स्पर्धेतून त्यांचे फॉर्म मागे घेतले होते. इतकंच नाही तर ऐश्वर्या रायला घाबरुन मुली त्यांचे फॉर्म मागे घेत आहेत हे पाहून सुश्मितानेही तिचा फॉर्म मागे घेतला होता. परंतु, केवळ आईच्या सांगण्यावरुन सुश्मिताने पुन्हा या स्पर्धेत सहभाग घेतला. इतकंच नाही तर तिने ऐश्वर्या रायला हरवत मिस इंडियाचा खिताबही जिंकला.

ऐश्वर्याच्या भीतीने सुश्मिताने घेतली माघार

फारुख शेख यांच्या 'जीना इसी का नाम हैं' या कार्यक्रमात सुश्मिताने १९९४ साली घडलेला किस्सा सांगितला. "ऐश्वर्या राय त्यावेळी मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. तिच्या सहभागामुळे २५ मुलींनी त्यांची नावे मागे घेतली होती.  ज्यावेळी मी तिथे गेले त्यावेळी आयोजकांनी मला याविषयी सांगितलं. सोबतच तू सुद्धा तुझं नाव मागे घेणार आहेस का? असं विचारलं. हे ऐकताच प्लीज, माझा फॉर्म पण परत द्या. मला भाग नाही घ्यायचा", असं मी सांगितलं आणि माघार घेतली.

आईमुळे झाले पुन्हा सहभागी

पुढे ती सांगते, "मी ऐश्वर्यामुळे फॉर्म मागे घेतला हे तिला मी स्वत: सांगितलं होतं. ती खूप सुंदर आहे आणि तिच्या सौंदर्याची चर्चा जगभरात होते. त्यामुळे मला तिच्याशी स्पर्धा करायची न्वहती. मी घरी आले आणि आईला सांगितलं. त्यावर आईने माझी चांगलीच कानउघडणी केली. तू हे काय केलंस? प्रयत्न करण्यापूर्वीच हार मानलीस. ती असली म्हणून काय झालं. ती जिंकली तर जिंकू दे तिला. जर तुला असं वाटतंय ती जगातली सगळ्यात सुंदर मुलगी आहे तर तिच्यासमोर हार. कुण्या दुसऱ्यासमोर हरण्यात काय अर्थ आहे. जा, आणि तुझं बेस्ट दे", असं आईने मला सांगितलं.

ऐश्वर्या-सुश्मितामध्ये झाली टफ फाईट

मिस इंडिया स्पर्धेत सुश्मिता आणि ऐश्वर्या यांच्यात फायनल राऊंडमध्ये टफ फाइट झाली. या दोघींमध्ये टाई  ब्रेकर झालं. पण, एका उत्तरामुळे सुश्मिताने बाजी मारली. या शेवटच्या राऊंडमध्ये ऐश्वर्या रायला विचारण्यात आले की, जर तुला पतीच्या चांगल्या गुण्याबाबत विचारले गेले तर तू 'द बोल्ड'मधील  Ridge Forrester आणि 'सांता बरबरा'मधील Mason Capwell या दोनपैकी कोणत्या कॅरेक्टर  प्राधान्य देशील. त्यावेळी ऐश्वर्याने  Mason Capwell हे उत्तर दिलं होतं.  तर, त्याचवेळी सुश्मिताला भारताच्या वस्त्रोद्योगाविषयी प्रश्न विचारला गेला होता. ज्याचे उत्तर देताना ती म्हणाली, पोशाखाचा वारसा महात्मा गांधींच्या काळापासून सुरू झाला. या प्रश्नाचे चोख उत्तर देत सुष्मिताने हा किताब आपल्या नावावर केला.

टॅग्स :सुश्मिता सेनऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडमिस इंडिया