Join us  

रात्र झाली की दिग्दग्दर्शक फोन करण्यास सुरूवात करायचा, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट !

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2020 5:38 PM

चित्रीकरणादरम्यान संबंधित दिग्दर्शिक कायम आपल्या मागावर असायचा आणि रात्र झाली की फोन करण्यास सुरूवात करायचा.

बॉलिवूडमध्ये आजवर  कित्येकजणींनी आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना वाचा फोडली आहे. यांत अभिनेत्री म्हणजे स्वरा भास्करनेही तिला आलेला अनुभव सांगताच अनेकजणांना शॉक लागला होता.  करियरच्या सुरूवातीला अनेक दिग्दर्शकांनी त्रास दिल्याचा आरोप तिने केला होता. काम देण्याच्या बहाण्याने बऱ्याच पुरूषांनी विविध मागण्या केल्या. मात्र त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी आपल्या मेसेजेसना उत्तर देणं बंद केल्याचंही तिने सांगितलं होतं. त्यांना हवी असणारी गोष्ट मी देऊ शकणार नसल्याचा अंदाज आल्यानंतर त्यांचे मेसेज बंद झाले असं स्वराने सांगितले होते. 

मात्र या सगळ्या गोष्टीमुळे असुरक्षितेची भावना निर्माण झाल्याचेही तिने नमूद केले होते.  एकदा 56 दिवसांच्या शूटिंगसाठी आऊटडोअर असताना काय घडलं याचा किस्साही तिने शेअर केला सांगितला. त्या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान संबंधित दिग्दर्शिक कायम आपल्या मागावर असायचा आणि रात्र झाली की फोन करण्यास सुरूवात करायचा.

अनेकदा सिनेमाच्या कथेसंदर्भात तो हॉटेलच्या रूमवर बोलवायचा आणि आपल्यासमोरच हातात दारूचा ग्लास घेऊन बसायचा. एकदा तर मद्यधुंद अवस्थेत आपल्या खोलीत तो शिरला आणि मिठी मारण्यास सांगितलं असा किस्सा स्वराने सांगितला होता. या सगळ्या घटनेमुळे भेदरल्याचे स्वराने नमूद केले. या प्रसंगानंतर पॅकअप झाल्यावर रूमवर लाईट्स बंद करून बसायचे ज्यामुळे त्या दिग्दर्शकाला आपण झोपलो आहोत असं वाटेल असंही स्वराने सांगितले होते. 

रिया चक्रवर्तीला फसवले जात आहे- स्वरा भास्कर

सध्या स्वरा आणखीन एका कारणामुळे चर्चेत आहे. स्वरा भास्कर सातत्याने सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देत आहे. यासोबतच रिया चक्रवर्तीच्या समर्थनार्थ स्वरा पुढे सरसावली आहे. स्वराने याप्रकरणी आपले मत देत सांगितले की, रिया चक्रवर्तीला फसवण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्वराने ही बाब सोशल मीडियावर युजरच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना सांगितले.

स्वराने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की चॅट सांगते की रिया चक्रवर्तीने 2019 मध्ये सुशांत सिंग राजपूतच्या कुटुंबाला त्याच्या मानसिक आजाराबद्दल सांगितले होते. मोठ्या आवाजात बोलणारे अँकर या स्टोरीकडे कानाडोळा करत आहेत का?, असे वाटते का की रियाला यात फसविले जात आहे? सोशल मीडियावर स्वराचं हे ट्विच व्हायरल होत आहे.

टॅग्स :स्वरा भास्कर