Join us  

इंशाअल्लाह...!! सलमानने ‘या’ गोष्टीसाठी धरला होता हट्ट, म्हणून भन्साळींनी थांबवला चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 11:05 AM

सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अनेक वर्षांनंतर ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार होते. या चित्रपटात आलिया भट आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार होती. पण आता हे शक्य नाही.

ठळक मुद्देसलमानला कथेत बदल हवा होता. त्याने ‘दबंगगिरी’ दाखवणे सुरु केले आणि प्रकरण चिघळले.

सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी अनेक वर्षांनंतर ‘इंशाअल्लाह’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करणार होते. या चित्रपटात आलिया भट आणि सलमान खान ही जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार होती. पण आता हे होणे नाही. कारण भन्साळींनी ‘इंशाअल्लाह’ हा चित्रपट बंद केला आहे आणि आता सलमाननेही या चित्रपटातून अंग काढून घेतले आहे.

तूर्तास ‘इंशाअल्लाह’वरून सलमान व भन्साळी यांच्यात बिनसल्याची चर्चा आहे. सूत्रांचे मानाल तर सलमान या चित्रपटात गरजेपेक्षा अधिक हस्तक्षेप करत होता. या मतभेदाचे एक मोठे कारण आता पुढे आले आहे. होय, स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान या चित्रपटात डेजी शाह आणि वलूशा डिसूजा यांना कास्ट करू इच्छित होता. पण भन्साळी यासाठी तयार नव्हते. मग काय, भन्साळींनी हा प्रोजेक्ट थांबवण्याचा निर्णय घेतला आणि सलमानही याा प्रोजेक्टमधून बाहेर पडला. भन्साळी प्रॉडक्शनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाच्या कथेत सतत हस्तक्षेप केला जात होता. भन्साळी आपल्या चित्रपटांबद्दल मोठ मोठ्या दिग्गजांचे ऐकत नाहीत. पण सलमानला कथेत बदल हवा होता. त्याने ‘दबंगगिरी’ दाखवणे सुरु केले आणि प्रकरण चिघळले.

या संपूर्ण प्रकरणावर सलमान मुंबई मिररशी बोलला. तो म्हणाला की, ‘भन्साळींबद्दल मी एवढेच म्हणेल की, ते आपल्या चित्रपटाबद्दल कुठलीही तडजोड करत नाही. मी म्हणेल की, त्यांनी त्यांना हवे तसे चित्रपट बनवावेत. माझ्या मनात भन्साळींबद्दल कुठलीही कटुता नाही. त्यांच्या मनातही असे काही नसेल, अशी आशा करतो. मी भन्साळींची आई आणि त्यांच्या बहिणीच्या अतिशय जवळ आहे. मी भन्साळींच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देईल. भविष्यात आम्ही नक्कीच एकत्र काम करू, इंशाअल्लाह...’

टॅग्स :सलमान खानसंजय लीला भन्साळी