Join us  

'भारत'च्या सेटवर सलमान खानला झाली दुखापत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 1:10 PM

'भारत' चित्रपटाच्या सेटवर सलमानला दुखापत झाली आणि तो मुंबईत परतला आहे.

ठळक मुद्देसलमान खानला जिममध्ये एक्सरसाईज करताना झाली दुखापत

बॉलिवूडचा दबंग खान सलमानचा आगामी चित्रपट 'भारत'ची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण माल्टा व अबूधाबीमधील पूर्ण झाले आहे आणि सध्या पंजाबमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र या चित्रपटाच्या सेटवर सलमानला दुखापत झाली आणि तो मुंबईत परतला आहे. 

सलमान खानला 'भारत'च्या सेटवर दुखापत झाली नसून ही दुखापत जिममध्ये एक्सरसाईज करताना झाली आहे. सुत्रांच्या माहितीनुसार त्याची दुखापत फार मोठी नसून त्याला आरामाची गरज असल्याने मुंबईला परतला आहे. त्याचे पंजाब येथील चित्रीकरण अजून पूर्ण झाले नाही. मात्र, लवकरच तो पुन्हा चित्रीकरण सुरू करणार आहे. सध्या कतरिना कैफ आणि सुनिल ग्रोवर यांचे पंजाब येथे शूटिंग सुरू आहे.अली अब्बास दिग्दर्शित 'भारत' चित्रपट अलिकडेच पाकिस्तानचा झेंडा फडकवल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाच्या एका सीनसाठी सलमान आणि कतरिनाला वाघा बॉर्डरवर चित्रीकरण करायचे होते. मात्र वाघा बॉर्डरवर याची परवानगी नसल्याने पंजाब येथे वाघा बॉर्डरचा सेट उभा केला गेला. या दरम्यान भारत आणि पाकिस्तानचा झेंडाही उभारला गेला. यामुळे पंजाब येथील नागरिकांनी याचा कडाडून विरोध केला. त्यांनी याविरोधात पोलिसात तक्रारही दाखल केली होती.अली अब्बास जफरचा 'भारत' हा सलमानसोबतचा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांचे 'सुलतान' व 'टायगर जिंदा है' हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. 'भारत' या चित्रपटात कतरिनाशिवाय तब्बू आणि दिशा पटानी या अभिनेत्रीदेखील झळकणार आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी ५ जूनला प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :सलमान खानभारत सिनेमा