Join us  

दिव्या भारतीच्या निधनाच्या २७ वर्षानंतर साजिद नाडियाडवालाच्या दुस-या पत्नीने केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 5:19 PM

दिव्याने 20 मे 1992 रोजी साजिद यांच्याशी लग्न केले होते. पण लग्नाच्या 11 महिन्यांनंतर तिचे 5 एप्रिल 1993 रोजी निधन झाले. मृत्यूसमयी दिव्या फक्त 19 वर्षांची होती.

दिव्या भारतीच्या निधनानंतर दिव्या भारतीचा पती निर्माता साजिद नाडियाडवालाने वर्धा खानसोबत दुसरे लग्न करत आपला संसार थाटला.  दिव्याने 20 मे 1992 रोजी साजिद यांच्याशी लग्न केले होते. पण लग्नाच्या 11 महिन्यांनंतर तिचे 5 एप्रिल 1993 रोजी निधन झाले. मृत्यूसमयी दिव्या फक्त 19 वर्षांची होती. पाचव्या मजल्यावरील बाल्कनीतून खाली पडल्याने दिव्याचे निधन झाले, असे सांगितले जाते परंतु तिचा मृत्यू आजही रहस्यच आहे. दिव्या भारती आणि साजिद यांच्या नात्याने नियतीने तर साथ दिली नाही. मात्र साजिद आणि वर्धा खान यांचा गुण्या गोविंदाने संसार सुरू आहे. साजिद आणि वर्धा यांना दोन मुले आहेत. सुभान आणि सुफियान अशी दोन्ही मुलांची नावं आहेत. यात सुभान हा साजिद आणि वर्धा यांचा मोठा मुलगा आहे. सुभान लूक्समध्ये खूपच हँडसम असून त्याला पाहताच भले भलेही त्याच्यावर फिदा नाही झाले तर नवलच.

वर्धाने सांगितले की, दिव्या आजही आमच्या कुटुंबाच्या आठवणीत जिवंत आहे आणि तिने कधीही तिचे स्थान घेण्याचा प्रयत्न केला नाही. 'लोक अनेकदा अनेक प्रश्न विचारतात आणि मला ट्रोलही करतात. पण मला सांगायचे आहे की, दिव्या अजूनही आमच्या जीवनाचा एक भाग आहे, तिचे कुटुंब, तिचे वडील, तिचा भाऊ कुणाल आमच्यासाठी कुटुंबाप्रमाणेच आहेत, ते प्रत्येक आनंदात सामील असतात.

दिव्याच्या वाढदिवशी किंवा पुण्यतिथीनिमित्त आम्ही एकमेकांशी बोलतो. जेव्हा माझी मुले दिव्याचे चित्रपट पाहतात, तेव्हा तिला बडी मम्मी म्हणून हाक मारतात.'

'साजिद आणि दिव्याच्या कुटुंबात खूप चांगले संबंध आहेत, ते दिव्याच्या वडिलांसाठी त्यांच्या मुलासारखेच आहेत. मी कधीही दिव्याची जागा घेण्याचा प्रयत्न केला नाही. मी माझी वेगळी जागा बनवली. आठवणी नेहमीच सुंदर असतात.'

टॅग्स :साजिद नाडियाडवालादिव्या भारती