Join us  

रणबीर व आलियाच्या नात्यावर अखेर बोलले ऋषी कपूर...वाचा काय म्हणाले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 10:03 AM

रणबीरचे पापा ऋषी कपूर यांनी रणबीर व आलियाच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या ‘ब्रह्मास्त्र’च्या शूटींगमध्ये बिझी आहेत. इकडे दोघांच्याही अफेअरच्या चर्चेला ऊत आलाय. दोघांच्या कुटुंबातही जवळीकता वाढताना दिसतेय. अशात रणबीरचे पापा ऋषी कपूर यांनी रणबीर व आलियाच्या नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.ऋषी कपूर यांनी अलीकडे मिड-डेला मुलाखत दिली. रणबीर व आलियाच्या संबंधांबद्दल विचारले असता ते म्हणाले की, ‘जे काही आहे, सगळ्यांनाच ठाऊक आहे. मला काहीही बोलायची गरज नाही. मी फक्त एवढे म्हणेल की, रणबीरच्या लग्नासाठी ही अगदी योग्य वेळ आहे. मी २७ वर्षांच्या वयात संसारात पडलो होतो. रणबीर ३५ वर्षांचा झाला आहे. त्यामुळे त्याने लग्नाबद्दल विचार करायला हवा. आपल्या आवडत्या मुलीशी तो लग्न करू शकतो. आम्हाला याबद्दल काहीही आक्षेप नाही. पण जाण्यापूर्वी मी आपल्या नातवांसोबत खेळू इच्छितो.’ ‘रणबीरचा फोकस अधिकाधिक आपल्या कामावर आहे. तो ज्या मुलींना भेटतो, त्या सगळ्या बॉलिवूडच्या नट्या आहेत. तो लोकांना फार भेटत नाही. हे चित्रपटांत काम करणाऱ्यांची दुसरी बाजू आहे,’असेही ते म्हणाले.तुम्ही रणबीरसमोर त्याच्या लग्नाचा विषय काढलात का, असे विचारले असता, मी या विषयावर त्याच्याशी फार बोलत नाही. पण माझी पत्नी त्याच्यामागे तगादा लावून असते आणि रणबीर या प्रश्नांपासून दूर पळत असतो. रणबीर जेव्हाकेव्हा लग्नासाठी तयार होईल, आम्हाला आनंदचं होईल, असे ते म्हणाले.

 

टॅग्स :रणबीर कपूर