Join us  

 रणबीर-आलियाच्या लग्नासाठी कपूर कुटुंबाची लगबग; या ठिकाणी होणार लग्नानंतरची पूजा  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2019 10:32 AM

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे.

ठळक मुद्दे 2020 मध्ये आलिया व रणबीर लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

आलिया भट आणि रणबीर कपूरच्या लग्नाची सध्या बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी दोघांच्या लग्नाची  खोटी पत्रिकादेखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. पण आता या कपलच्या लग्नाची नाही तर लग्नानंतरच्या पूजेची चर्चा सुुरू आहे. होय, रणबीरचे मॉम-डॅडने या कपलच्या लग्नानंतर एक खास पूजा करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, ही खास पूजा एका खास ठिकाणी होणार आहे.ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांच्या कृष्णाराज प्रॉपर्टीच्या नुतनीकरणाचे काम सुरु आहे.  रणबीर व आलियाच्या लग्नानंतर याच ठिकाणी एक खास पूजा करण्याची ऋषी व नीतू यांची इच्छा आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीतू यांनी आपल्या आर्किटेक्टला पुढील वर्षी हिवाळ्यापर्यंत  बेसमेंटचे काम पूर्ण करण्यास सांगितले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे रणबीर-आलियाच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे.

 ऋषी व नीतू यांनी 1980 मध्ये पाली हिलमधील हा बंगला खरेदी केला होता. याच घरात ऋषी व नीतू यांनी 35 वर्षे घालवली. यानंतर हा बंगला पाडून त्याठिकाणी 15 माळ्यांची बिल्डींग बांधण्याचा निर्णय ऋषी व नीतू यांनी घेतला होता. याच ठिकाणी आलिया व रणबीरच्या लग्नानंतरची पूजा संपन्न होईल. नीतू यांच्या गुरुजींनी हा सल्ला दिल्याचेही कळतेय.

 2020 मध्ये आलिया व रणबीर लग्न करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चा ख-या मानाल तर आलिया व रणबीर डेस्टिनेशन वेडिंग प्लान करत आहेत आणि यासाठी त्यांनी विदेशाची नव्हे तर भारताचे नंदनवन अर्थात काश्मीरची निवड केली आहे. तूर्तास आलिया व रणबीर न्यू इअर सेलिब्रेशनसाठी विदेशात रवाना झाले आहेत.  

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटनितू सिंगऋषी कपूर