Join us

विरुष्काच्या लग्नाचे मुंबईत होणाऱ्या ग्रॅण्ड रिसेप्शनची वाचा संपूर्ण माहिती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 19:50 IST

इटली येथे लग्न केल्यानंतर दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन देणाºया विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचे मुंबईत दुसरे रिसेप्शन होत आहे. ...

इटली येथे लग्न केल्यानंतर दिल्लीत ग्रॅण्ड रिसेप्शन देणाºया विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या लग्नाचे मुंबईत दुसरे रिसेप्शन होत आहे. सध्या या रिसेप्शनची जय्यत तयारी सुरू असून, हे रिसेप्शन दिल्लीपेक्षाही भव्यदिव्य होण्याची शक्यता आहे. दिल्ली येथे पार पडलेल्या या भव्य रिसेप्शन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले होते. त्याचबरोबर अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी या सोहळ्यात हजेरी लावली होती. नाच-गाणे, खाणे-पिणे अशा रंगारंग अंदाजात हा सोहळा पार पडला होता. आता मुंबई येथे २६ डिसेंबरला होणाºया ग्रॅण्ड रिसेप्शनकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे. सध्या या रिसेप्शनची जोरदार तयारी केली जात आहे. विशेष म्हणजे मुंबईतील रिसेप्शनकडे स्वत: विराट आणि अनुष्का लक्ष ठेवून असल्याने हा सोहळा चांगलाच भव्यदिव्य होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सोहळ्यात काय बेस्ट असेल तसेच सोहळ्यात येणारे निमंत्रित कोण असतील, हॉटेलला कशा पद्धतीने सजविण्यात आले आहे, याबाबतची इत्यंभूत माहिती आम्ही या वृत्तांताच्या माध्यमातून देत आहोत. निमंत्रित पाहुणे : मुंबई येथे होणाºया या ग्रॅण्ड रिसेप्शन सोहळ्यात बॉलिवूडचा किंग शाहरूख खान, सलमान खान, आमिर खान, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग, करण जोहर, कॅटरिना कैफ, राणी मुखर्जी, मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासह बॉलिवूड-उद्योग जगतातील अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. व्हेन्यू : दिल्लीच्या तुलनेत मुंबईतील रिसेप्शन आणखी भव्यदिव्य होण्याची शक्यता आहे. हा सोहळा मुंबईतील लोअर परेल भागातील -- मध्ये आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला विराट-अनुष्का होस्ट करणार आहेत. याठिकाणी रंगणार पार्टी : उपलब्ध माहितीनुसार, या अतिशय भव्य हॉटेलच्या टेरेस रूममध्ये पार्टी रंगण्याची शक्यता आहे. हे टेरेस मोकळे असल्याने त्याला चहूबाजूने सजविण्यात आले आहे. या बालरूममध्ये कमीत कमी तीनशेपेक्षा अधिक गेस्ट पार्टी करू शकतात. टेरेस चहुबाजूने फुलांनी सजविण्यात आले असून, कॅण्डलचाही वापर करण्यात आला आहे. वेळ : २६ डिसेंबरला मंगळवारी रात्री ८ वाजता सोहळ्याला सुरुवात होणार आहे. मात्र सायंकाळी ७ वाजेपासूनच पाहुणे उपस्थित राहण्यास सुरुवात होणार आहे.