Join us  

 राजस्थानात आलिया-रणबीरचा साखरपुडा? काका रणधीर कपूर यांनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 2:40 PM

अशी सुरु झाली साखरपुड्याची चर्चा

ठळक मुद्देआलिया व रणबीर, त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्र अचानक सगळेच्या सगळे जयपूरला पोहोचण्याचे पाहून आलिया व रणबीर येथे साखरपुडा करणार असल्याची चर्चा सुरु झाली.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या जाम चर्चेत आहे. दोघेही रिलेशनशिपमध्ये आहेत, हे तर जगापासून लपलेले नाही. स्वत: रणबीर व आलियानेही याची जाहीर कबुली दिली आहे. पण सध्या चर्चा सुरु आहे ती दोघांच्या साखरपुड्याची. होय, रणबीर, आलिया शिवाय नीतू कपूर, रणबीरची बहीण रिद्धिमा, मित्र अयान मुखर्जी  इतकेच नाही तर दीपिका पादुकोण व रणवीर सिंग असे सगळेच एकाच वेळी राजस्थानातील रणथंबोर येथे पोहोचले. मग काय, आलिया-रणबीर रणथंबोरला गुपचूप साखरपुडा करणार असल्याचे मानले गेले. पण आता रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी यावर मोठा खुलासा केला आहे. 

एबीपी न्यूजशी बोलताना रणधीर कपूर यांनी आलिया-रणबीरच्या साखरपुड्याची बातमी निव्वळ अफवा असल्याचे सांगितले. ‘असे काहीही नाही. या बातमीत काहीही तथ्य नाही. रणबीर व आलियाचा साखरपुडा होणार असता तर मी आणि आमच्या कुटुंबातील अन्य लोक त्यांच्यासोबत असते ना? रणबीर, आलिया व नीतू तिथे सुट्टी एन्जॉय करण्यासाठी व न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी गेले आहेत. याशिवाय काहीही नाही, ’ असे रणधीर कपूर यांनी स्पष्ट केले.कपूर कुटुंबातील अन्य एका सदस्यानेही रणबीर-आलियाच्या साखरपुड्याची बातमी खोटी असल्याचे सांगितले. आलियाची आई सोनी राजदान यांनी मात्र यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. अलीकडे पत्रकार राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत रणबीरने लग्नाबद्दल मोठा खुलासा केला होता. कोरोना महामारी नसती तर माझे व आलियाचे लग्न झाले असते, असे तो म्हणाला होता.

कशी सुरु झाली साखरपुड्याची चर्चामंगळवारी आलिया व रणबीर मुंबई एअरपोर्टवर दिसले. त्यांच्यासोबत रणबीरची आई नीतू कपूर, रणबीरची बहीण रिद्धिमा असे सगळे होते.   यानंतर काही वेळातच दीपिका पादुकोण व रणबीर कपूरही जयपूरला रवाना झालेत. एवढेच नाही तर आलिया व रणबीरचा जिगरी दोस्त व दिग्दर्शक अयान मुखर्जीही मुंबई एअरपोर्टवर दिसला. इतके कमी की काय म्हणून महेश भट आणि आदर जैन आधीच रणथंबोर येथे पोहोचली बातमी आली. करण जोहरही गोव्यात असून तो सुद्धा लवकरच राजस्थानला पोहोचणार असल्याचे सांगितले गेले. आलिया व रणबीर, त्यांचे कुटुंबीय व जवळचे मित्र अचानक सगळेच्या सगळे जयपूरला पोहोचण्याचे पाहून आलिया व रणबीर येथे साखरपुडा करणार असल्याची चर्चा सुरु झाली. 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भटरणधीर कपूर