Join us  

मोठ्ठीचं हिरोईन हवी! ‘संजू’च्या यशानंतर रणबीर कपूरचे नखरे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 12:57 PM

 एखादा चित्रपट सुपरडुपर हिट व्हायची देर की, कलाकारांचे अख्खे वागणे बदलते. मग या कलाकारांचे नखरे झेलता झेलता दिग्दर्शक-निर्मात्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येते.

यश भविष्याबद्दलच्या तुमच्या सगळ्या धारणा बदलवू शकते. बॉलिवूडमध्ये तर हे सर्रास घडताना दिसते. एखादा चित्रपट सुपरडुपर हिट व्हायची देर की, कलाकारांचे अख्खे वागणे बदलते. पडत्या काळात साईन केलेल्या प्रोजेक्टमध्ये अचानक त्यांना अनेक त्रूटी दिसू लागतात. मग या कलाकारांचे नखरे झेलता झेलता दिग्दर्शक-निर्मात्यांच्या अक्षरश: नाकीनऊ येते. सध्या रणबीर कपूरबद्दल हेच म्हणतात येईल. ‘संजू’च्या यशानंतर रणबीरचे नखरे इतके वाढलेत की, त्याने दिग्दर्शक लव रंजन यांच्यासमोर एक वेगळीच अट ठेवलीय. 

होय, ‘संजू’च्या रिलीजआधी रणबीरने लव रंजन यांचा एक चित्रपट करण्यास होकार दिला होता. यात अजय देवगणही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. पण ‘संजू’च्या अफाट यशानंतर रणबीर लव रंजनच्या या प्रोजेक्टकडे वेगळ्याच नजरेतून पाहू लागला आहे. रणबीरची टीम तर इतकी अ‍ॅक्टिव्ह झाली आहे की, या टीमने लव रंजन यांना त्यांच्या स्क्रिप्टमध्ये काही बदल सुचवले आहेत. चित्रपटात सगळा फोकस रणबीरवर राहिल यादृष्टीने चित्रपटात काही बदल करण्याची टीमची मागणी आहे. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटात रणबीरच्याच तोडीची हिरोईन हवी, असाही रणबीरच्या टीमचा आग्रह आहे. चित्रपटाचा हिरो ३०० करोडी आहे तर तर हिरोईनही मोठ्ठीच हवी, असे रणबीरच्या टीमचे म्हणणे आहे. म्हणजे, लव रंजन यांनी आधी या चित्रपटासाठी प्लान केलेल्या हिरोईनवर रणबीरने फुली मारली आहे.बॉलिवूड जाणकारांच्या मते, कलाकाराचा एखादा चित्रपट हिट झाला वा फ्लॉप झाला, त्यानुसार त्याची टीम पुढचे नियोजन करत असते. रणबीरचा ‘संजू’ सुपरडुपर हिट झाल्यानंतर आगामी प्रोजेक्टसाठी त्याने काही अटी ठेवल्या असतील तर ते सामान्य आहे. बॉलिवूडमध्ये असे चालतेच.

‘संजू’ सुपरहिट झाला आणि ही लोकप्रीयता आणखी कित्येकपटींनी वाढली आहे.  साहजिकचं अनेक बड्या ब्रँडमध्ये रणबीरला साईन करण्याची चढाओढ सुरु आहे. पण आता रणबीर आपल्या प्रोजेक्ट्सबद्दल अधिक सावध झाला आहे. रणबीरने काय करावे अन् काय करू नये, याबाबत त्याची टीम अगदी स्पष्ट आहे. 

टॅग्स :रणबीर कपूर