Join us  

आलिया - रणबीर कधी करणार लग्न?, दोघांच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल मोठी माहिती आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 1:15 PM

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाबाबत अनेक बातम्या सातत्याने येत आहेत. या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या दोघांच्या  अफेयरच्या चर्चा सतत रंगत असतात. दोघांचं एकत्र दिसणं, फिरणं यांत काही नवं राहिलं नाही. लवकरच हे दोघं लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे.अनेदा दोघांच्या लग्नाच्या प्लॅनिग विषयी वेगवेगळ्या गोष्टी समोर येत असतात. दोघांनी आजपर्यंत कधीच त्यांच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही.

मात्र सतत एकत्र असल्याने चाहत्यांनाच त्यांच्यात मैत्रीशिवाय दुसरे नाते असल्याचे तर्कवितर्क लावले जातात. दोघांमध्येही सुंदर केमिस्ट्री पाहायला मिळते. दोघांचीही जोडी चाहत्यांनाही प्रचंड आवडते. त्यामुळे दोघांनीही लग्न करावे अशी चाहत्यांचीही ईच्छा आहे.  रणबीर आणि आलिया या दोघांनीही अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नसला तरी या दोघांच्या चाहत्यांनादेखील त्यांच्या लग्नाची उत्सुकता आहे.  

आलिया आणि रणबीर त्यांच्या लग्नाची प्लॅनिंग सांगत नाही त्याआधीच KRK म्हणजेच कमाल खानने  त्यांच्या लग्नाचा मुहुर्त ठरवला आहे. लग्नाचा मुहुर्ताबरोबर दोघांच्याही घटस्फोटाबाबतीही भविष्यवाणी त्याने केली आहे.  कमाल खान विषयी आणखी दुसरे काही सांगायला नको. कारण सतत कोणत्याही मुद्द्यावर तो मत मांडत वाद निर्माण करत असतो. तसेच बॉलिवूड कलाकारांचे खासगी आयुष्याबद्दलही बिनधास्त सोशल मीडियावर बोलतांना दिसतो. आता कमाल खानने आलिया आणि रणबीर यांचीच पर्सनल लाईफ सोशल मीडियावर आणली आहे.लग्नाबद्दलची भविष्यवाणी करत त्याने नेटीझन्सचे लक्ष वेधले आहे.

केआरकेच्या वर्तवलेल्या भाकितनुसार आलिया- रणबीर पुढच्या वर्षी २०२२ वर्षाच्या अखेरीस लग्नबंधनात अडकणार असल्याचे त्याने म्हटले आहे. याच बरोबर दोघांचेही नाते फार काळ काही टिकणार नसल्याचेही त्याने म्हटले आहे. दोघांचाही लग्नाच्या १५ वर्षानंतर घटस्फोट होणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.  2037 मध्ये दोघेही एकमेकांपासून घटस्फोट घेत वेगळे होतील असे सांगत त्याने रणबीर आणि आलिया यांना कारण नसतानाच त्यांच्यावर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे. 

 

टॅग्स :रणबीर कपूरआलिया भट