Join us  

"लवकर लग्न केले तर सिनेमात काम मिळणार नाही" असं म्हणणा-यांची करिनाने केली होती बोलती बंद, नाकावर टीच्चुन केले होते हे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 6:00 AM

करिनानेच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, लोकं बोलायची लग्न करु नको, कारण लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं.

बॉलिवूडमध्ये काही मोजके सिनेमा केल्यानंतर  अभिनेत्री एक तर लग्न करुन त्यांच्या खासगी आयुष्यात सेटल होतात. तर काही अभिनेत्रींचा बॉलीवुडच्या कडव्या स्पर्धेत निभाव लागू शकला नाही त्यामुळे त्या कुठे गेल्या हे कुणालाच कळलं नाही. या सगळ्या गोष्टींना अभिनेत्री करिना कपूर खान. लग्नानंतरही करिनाची जादू कायम असल्याचे पाहायला मिळते. 

 

याविषयी खुद्द करिनानेच लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, लोकं बोलायची लग्न करु नको, कारण लग्नानंतर अभिनेत्रींचं करिअर संपतं. बॉलीवुडमधील अनेक अभिनेत्रीचं करिअर लग्नानंतर संपलं. लग्न झालेल्या अभिनेत्रींना काम मिळत नाही. त्यानंतर लोक बोलू लागले की मुलं झाल्यावर तर बिल्कुलच काम मिळणार नाही. मात्र माझ्याबाबतीत उलट घडत आहे. आजघडीला मी चित्रपट नाकारत आहे. कारण मला माझ्या कुटुंबाला आणि तैमूरला वेळ द्यायचा आहे. चित्रपट नाकारत असले तरी माझ्याकडे आज ब-याच चित्रपटाच्या ऑफर्स  आहेत. ज्या गोष्टी आजवर घडत होत्या त्या मी कायम बदलत राहिले.

जीवनाच्या या टप्प्यावर वेळ माझ्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे. कुटुंब आहे, तैमूर आहे. माझ्या पालकांचीही मला काळजी घ्यायची आहे. जबाबदा-या खूप वाढल्या आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता यावा यासाठी मी कमी चित्रपट स्वीकारते. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये एकावेळी जास्त काम करण्याची क्षमता असते. त्यातच वेळेचं नियोजन करता येणं गरजेचं असतं. माझ्यासाठी वेळ ही खूप महत्तवाची असते. संध्याकाळी माझं शुटिंग असेल आणि सकाळी मी काहीच काम ठेवत नाही. त्यावेळी मी घरी राहणंच पसंत करते. सकाळी लवकर कामास सुरुवात करायलाही माझी काहीच हरकत नाही. रात्रीचं जेवण घरीच करणं मी पसंत करते.  

 

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान