Join us  

कंगना राणौतने अनुराग बासूच्या ‘इमली’ला दिला नकार! हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 10:06 AM

आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी कंगना राणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडे ‘पंगा’ आणि ‘मेंटल है क्या’ या दोन चित्रपटांच्या सेटवरचे तिचे फोटो व्हायरल झालेत. आता कंगना तिच्या आणखी एका आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.

ठळक मुद्देकंगनाने अनुरागसोबतच करिअरची सुरुवात केली होती. २००६ मध्ये अनुराग बासू दिग्दर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते.

आपल्या परखड वक्तव्यांमुळे कायम चर्चेत राहणारी कंगना राणौत सध्या तिच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडे ‘पंगा’ आणि ‘मेंटल है क्या’ या दोन चित्रपटांच्या सेटवरचे तिचे फोटो व्हायरल झालेत. आता कंगना तिच्या आणखी एका आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. होय, कंगनाने अनुराग बासूचा ‘इमली’ हा चित्रपट साईन केला होता. पण आता कंगनाने या चित्रपटातून अचानक अंग काढून घेतलेय.कंगनाने अनुरागसोबतच करिअरची सुरुवात केली होती. २००६ मध्ये अनुराग बासू दिग्दर्शित ‘गँगस्टर’ या चित्रपटातून कंगनाने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. त्यामुळे कंगना व अनुराग यांच्यात एक वेगळे बॉन्डिंग आहे. याच बॉन्डिंगमुळे वा मैत्रीमुळे म्हणा, अनुरागच्या ‘इमली’ या चित्रपटात काम करण्यास कंगनाने होकार दिला होता. या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हा, कंगना  खूश होती. अनुरागसोबत पुन्हा काम करण्यास मी प्रचंड उत्सुक आहे, असे बरेच काही ती म्हणाली होती. पण आताश: कंगनाचा हा उत्साह कदाचित मावळला आहे.

डीएनएला दिलेल्या मुलाखतीत कंगना अनुरागच्या चित्रपटाबद्दल बोलली. गतवर्षी मी ‘पंगा’ आणि ‘इमली’ या दोन चित्रपटांची एकत्र घोषणा केली होती. गत नोव्हेंबरमध्येच या चित्रपटाचे शूटींग सुरु होणार होते. पण ‘मणिकर्णिका’मुळे मला ‘इमली’ लांबणीवर टाकावा लागला होता. ‘पंगा’चे शूटींग सुरु झाले होते. त्यामुळे मी त्या चित्रपटाला नकार देऊ शकत नव्हते. अनुरागसोबत मी यासंदर्भात बोलले. खरे तर मला अतिशय वाईट वाटतेय. कारण ‘इमली’च्या निमित्ताने मी व अनुराग पुन्हा एकत्र काम करणार होतो. पण आता काहीच आठवड्यांत मी माझ्या स्वत:च्या नव्या चित्रपटाची घोषणा करणार आहे, असे कंगना यावेळी म्हणाली. तिच्या या बोलण्यावरून अनुरागचा ‘इमली’ करण्यास कंगनाकडे वेळ नाही, हे स्पष्ट आहे.

कंगना स्वत:च्याच आयुष्यावर बायोपिक बनवणार असल्याचे मानले जात आहे. कदाचित अनुरागच्या ‘इमली’पेक्षा हे बायोपिक तिच्यासाठी अधिक महत्त्वाचे आहे.

टॅग्स :कंगना राणौत