Join us  

‘कबीर सिंह’ पूर्ण होईपर्यंत दुसरा चित्रपट नाही-शाहिद कपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2018 6:02 PM

सध्या तो ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटानंतर शाहिद कपूरने आपले धोरण बदलले आहे. आता तो एका वेळी एक चित्रपट करणार आहे.

शाहिद कपूर हा त्याला मिळालेला प्रत्येक चित्रपट अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने करतो. त्याच्या व्यक्तिरेखेसाठी तो प्रचंड मेहनत घेताना दिसतो. त्याने स्विकारलेली प्रत्येक भूमिका ही अत्यंत आव्हानात्मक असते. सध्या तो ‘कबीर सिंह’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'बत्ती गुल मीटर चालू' चित्रपटानंतर शाहिद कपूरने आपले धोरण बदलले आहे. आता तो एका वेळी एक चित्रपट करणार आहे.

शाहिद लवकरच 'कबीर सिंह' चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. शाहिद कपूरने यावर्षी 'पद्मावत' सारखा सुपरहिट चित्रपट दिला. या चित्रपटामध्ये त्याच्या कामगिरीचे प्रेक्षक आणि समीक्षकांनी खूपच कौतुक केले. तथापि, त्याच्या दुसरा चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू'ने बॉक्स आॅफिसवर चांगले सादरीकरण केले नाही. त्यामुळे शाहिदने आपले धोरण बदलले आहे. शाहिदने आता निश्चित केले की, तो एका वेळेस एकाच चित्रपटावर लक्ष देणार आहे. तो सध्या 'कबीर सिंह' वर आपले लक्ष केंद्रित करत आहे. हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत इतर कोणताही चित्रपट साइन करणार नसल्याचे त्याने ठरवले आहे. 'कबीर सिंह'दाक्षिणात्य चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार, शाहिदने या चित्रपटावर काम करणे सुरू केले आहे. या चित्रपटात तो एका डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. त्याच्यासोबत किआरा आडवाणी दिसेल. सध्या शाहिदने दीवाळीची सुटी घेतली आहे. पण लवकरच तो कामावर परतणार आहे. आता तोही बाकीच्या अभिनेत्याप्रमाणे एका वेळी एकच चित्रपट करणार आहे. एक पूर्ण होईपर्यंत तो कोणत्याही निर्मात्याला भेटणार नाही, किंवा नवीन स्क्रिप्टदेखील वाचणार नाही. हा निर्णय त्याने 'बत्ती गुल मीटर चालू' ला मिळालेला प्रतिसाद पाहून घेतला आहे. ?

टॅग्स :शाहिद कपूरबत्ती गुल मीटर चालू