Join us  

​ इम्तियाज अलीने टीकाकारांना दिले ‘हे’ उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2017 7:58 AM

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा होत्या. पण चित्रपट या अपेक्षांवर खरा उतरला नाही. ...

इम्तियाज अली दिग्दर्शित ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा होत्या. पण चित्रपट या अपेक्षांवर खरा उतरला नाही. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाला बºयाच टीकेला सामोरे जावे लागते आहे. ‘जब हॅरी मेट सेजल’ला इम्तियाज ‘टच’ दिसलाच नाही, असे टीकाकारांचे म्हणणे आहे. आत्तापर्यंत इम्तियाज यावर मौन बाळगून होता. पण अखेर तो बोललाच. टीकाकारांच्या टीकेला त्यांनी परखड उत्तर दिले. मी प्रशंसेसाठी चित्रपट बनवत नाही, असे त्याने म्हटले. ‘इम्तियाज अलीचे चित्रपट समजायला इंटलेक्चुअल असायला हवे, असे लोक म्हणतात. मला याबद्दल विचाराल तर मी हे सगळे बकवास आहे, असेच म्हणेल. मी कुठल्याही इंटलेक्चुअल ग्रूपचा भाग नाही. माझ्या हृदयाला स्पर्श करणारे चित्रपटच मला बनवायचे असतात. मी कधीच प्रशंसेसाठी चित्रपट बनवलेले नाहीत. काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न मी करत आलोय. काही तरी हटके आणि लोकांचे अधिकाधिक मनोरंजन करणारे चित्रपट बनवणे, हेच माझे लक्ष्य राहिले आहे,’ असे इम्तियाज म्हणाला. इम्तियाज अलीला ‘जब वुई मेट’,‘तमाशा’,‘हायवे’ आणि ‘रॉकस्टार’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. शाहरूख खान व अनुष्का शर्माची प्रमुख भूमिका असलेला ‘जब हॅरी मेट सेजल’ हा सिनेमा गत शुक्रवारी रिलीज झाला. अर्थात या चित्रपटाने प्रेक्षकांची काही प्रमाणात निराशा केली. पहिल्या दिवशी चित्रपटाला अपेक्षेनुसार ओपनिंग मिळू शकले नाही. पहिल्या दिवशी चित्रपटाने १५.२५ कोटी रूपयांची कमाई केली. दुसºयादिवशी म्हणजे शनिवारीही चित्रपटाने जवळपास इतक्याच रूपयांचा गल्ला जमवला.