Join us

गायक आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी केली होती अटक, जाणून घ्या काय आहे त्यामागील कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2018 11:15 IST

गेल्या काही महिन्यांपासून आदित्य नारायण आणि वाद असे काही समीकरण झाल्याचे दिसतेय. आदित्य कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहतो ...

गेल्या काही महिन्यांपासून आदित्य नारायण आणि वाद असे काही समीकरण झाल्याचे दिसतेय. आदित्य कोणत्या ना कोणत्या वादामुळे चर्चेत राहतो आहे. बॉलिवूडचा गायक आदित्य नारायण पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदित्य नारायणला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतल्या वर्सोवा परिसरात एका ऑटोरिक्षाला आदित्यच्या गाडीने टक्कर दिली आहे. रिक्षात बसलेले पॅसेंजर दुखापत झाली आहे. मुंबई पोलिसांनी 338 आणि 279 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर 10 हजारांच्या जामीनावर त्याची सुटका करण्यात आली.     याआधी आदित्यने रायपूर एअरपोर्टवर एका एअरलाईन्स अधिकाऱ्यासोबत हुज्जत घातली होती.मित्रांसोबत रायपूर एअरपोर्टवरुन परतताना जास्तीचं सामान बाळगल्यामुळे एअरपोर्टवरील अधिकाऱ्यांनी आदित्य नारायणला अडवलं होतं. जास्तीचं सामान बाळगल्यामुळे त्यासाठी अधिक पैसे द्यावे लागतील अशी मागणी अधिकाऱ्यांनी केली होती. पण आदित्यने अधिकाऱ्यांसोबत वाद घातला आणि त्याला मुंबईत ये तुला बघून घेऊन अशी धमकी सुद्धा दिली होती. आदित्य म्हणाला होता की, ''मी तुला मुंबईत बघून घेईल. कधी ना कधी तू मुंबईत येणारच, मग तुला बघून घेईल. तुझी चड्डी उतरविली नाही तर माझे नाव आदित्य नारायण नाही.'' आदित्यच्या या संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावरदेखील वाºयासारखा व्हायरल झाला होता.  फेसबुक आणि ट्विटरवर आदित्यच्या चड्डी उतरविणाºया डायलॉगची चांगलीच खिल्ली उडविली गेली होती.  मात्र त्यानंतर आदित्यने त्या कर्मचाऱ्याची माफी मागितली होती.  cnxoldfiles/script> आदित्यने बाल कलाकार म्हणून त्याच्या करिअरची सुरुवात केली. 'रंगीला', 'परदेश' आणि 'जब प्यार किसीसे होता है' सारख्या चित्रपटांमध्ये केले होते.  2010 मध्ये आलेल्या शापित चित्रपटात त्याने मुख्य भूमिका केली होती. सारेगमपा लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गेली अनेक वर्ष आदित्य करतो आहे.  छोट्या पडद्यावर आदित्याचा चेहरा ओळखीचा आहे. मात्र त्याला हवे तसे यश अजून बॉलिवूडमध्ये मिळवता आले नाही.