Join us

Friendship Day Special : ‘यारी हैं इमान मेरा, यार मेरी जिंदगी..’

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:16 IST

मैत्रीला कोणत्याही सीमा किंवा परिभाषा नाही ही बाब आता अनेकांनीच स्वीकारली आहे. अशा या अनोख्या नात्याचा उत्साह ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी साजरा केला जातो. विविध प्रकारचे मेसेजेस, भेटवस्तू किंवा मग नुसतीच फिरस्ती करत हा दिवस साजरा करण्यात येतो. बॉलिवूडचे कलाकार आणि मराठी चित्रपटसृष्टी यांच्यातील कलाकारांची एकमेकांसोबत बऱ्याचदा घट्ट मैत्री असल्याचे दिसून येते. पाहूयात, मग कोणकोण आहेत मराठी इंडस्ट्रीतील यार...दोस्त...यांची एकत्र दुनियादारी...

मैत्रीला कोणत्याही सीमा किंवा परिभाषा नाही ही बाब आता अनेकांनीच स्वीकारली आहे. अशा या अनोख्या नात्याचा उत्साह ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी साजरा केला जातो. विविध प्रकारचे मेसेजेस, भेटवस्तू किंवा मग नुसतीच फिरस्ती करत हा दिवस साजरा करण्यात येतो. बॉलिवूडचे कलाकार आणि मराठी चित्रपटसृष्टी यांच्यातील कलाकारांची एकमेकांसोबत बऱ्याचदा घट्ट मैत्री असल्याचे दिसून येते. पाहूयात, मग कोणकोण आहेत मराठी इंडस्ट्रीतील यार...दोस्त...यांची एकत्र दुनियादारी...सोनाली कुलकर्णी आणि रेणुका शहाणे या दोघी खुप चांगल्या मैत्रीणी आहेत. अनेक वर्षांपासून त्या एकत्र फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करतात.शुभांगी गोखले आणि सोनाली कुलकर्णी यांची मैत्रीही खूप जुनी असून आजही त्या एकमेकांसोबत मैत्रीपूर्ण दिवस सेलिब्रेट करताना दिसतात.क्रांती रेडकर, शिल्पा तुळसकर आणि सोनाली कुलकर्णी या तिघीही एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. एकत्र काम केलेलं नसलं तरीही त्या एकमेकांसोबत अनेक गोष्टी शेअर करत असतात.वीणा जामकर आणि स्पृहा जोशी या एकमेकांसोबत मैत्रीणींसारखंच नव्हे तर बहिणींसारखं राहतात.नंदिनी धुरी आणि वीणा जामकर या दोघी एकमेकींच्या स्पर्धक नसून चांगल्या मैत्रीणी आहेत.स्मिता तांबे, वीणा जामकर आणि मृण्मयी देशपांडे या तिघी जणी एकमेकींच्या खूप चांगल्या मैत्रीणी आहेत. त्यांची दुनियादारी त्या एकमेकांसोबतच शेअर करतात.सई ताम्हणकर आणि उर्मिला कानेटकर या दोघी कित्येक वर्षांपासून त्यांची मैत्री आज सेलिब्रेट करताना दिसतात.क्रांती रेडकर आणि उर्मिला कानिटकर या दोघी मैत्री आणि व्यावसायिक नाते एकमेकांपासून दूर ठेवून निखळ मैत्रीचा आनंद लुटतात.गिरीजा ओक आणि उर्मिला कानिटकर यांनी एका कार्यक्रमावेळी असा सेल्फी काढून त्यांच्यातील मैत्रीचे उत्तम उदाहरण आपल्यासमोर ठेवले आहे.उर्मिला कानिटकर आणि अमृता खानविलकर या दोघी एकमेकींच्या स्पर्धक नाही तर चांगल्या मैत्रीणी आहेत.नेहा, श्रुती, अमृता, सोनाली या चौघी आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्री मानल्या जातात. या चौघींचा एक खूप छान ग्रुप आहे. एकमेकींच्या स्पर्धक असूनही त्यांची खूपच चांगली मैत्री आहे. याविषयी नेहा सांगते, मॅच्युरिटीने गोष्टी हाताळल्या गेल्या तर अभिनेत्रीही खूप चांगल्या मैत्रिणी होऊ शकतात. आम्ही चौघीही नेहमीच आपापल्या कामात व्यग्र असतो. तरीही या सगळ्यातून आम्ही एकमेकींसाठी वेळ काढतो.अमृता सुभाष आणि कादंबरीने कुंदन शहा यांच्या चित्रपटात सगळ्यात पहिल्यांदा एकत्र काम केले होते. त्यानंतर त्या दोघी अवघाची संसार या मालिकेत झळकल्या. त्यांच्या मैत्रीविषयी अमृता सांगते, ‘अवघाची संसार या मालिकेत कादंबरी ही माझ्या लहान बहिणीची भूमिका साकारत होती. आता तर ती मला माझ्या बहिणीसारखीच आहे. अवघाची संसार या मालिकेच्या चित्रीकरणाच्यावेळी काही महिने मी आजारी होती. मला धड चालताही येत नव्हते. त्यावेळी आमचे चित्रीकरण मढ आयलंडला असायचे. आम्ही दोघी जेट्टीने जायचो. त्यावेळी एखाद्या लहान मुलाची आपण ज्याप्रकारे काळजी घेतो, तशी माझी काळजी कादंबरी घेत असे. मी अनेक गोष्टीत तिचा सल्ला घेते. मी कपडे काय घालू हे तर मी अनेकवेळा तिला विचारते. मिफ्ताला मी घातलेल्या कपड्यांचे सगळ्यांनीच कौतुक केले होते. त्या कपड्यांची निवड तिनेच केली होती. ती स्वत: एक प्रसिद्ध अभिनेत्री असूनही माझ्यासाठी अनेकवेळा फॅशन डिझायनरची भूमिका बजावते.आदिनाथ आणि वैभवची मैत्री ही गेली चार-पाच वर्षांपासून आहे. दोघेही त्यांच्या कामात नेहमीच व्यग्र असतात. पण तरीही ते एकमेकांना भेटायला आवर्जून वेळ काढतात. आदिनाथ सांगतो, आॅल द बेस्ट या नाटकाच्यावेळी माझी आणि वैभवची ओळख झाली. आमच्या दोघांचे ट्युनिंग कधी जमले हे आम्हाला दोघांनाही कळले नाही. वैभवमध्ये आणि माझ्यामध्ये खूप गोष्टी सारख्या आहेत, आम्ही दोघेही खूप खादाड आहोत, याचमुळे बहुधा आमचे पटत असावे असे मला वाटते. तर वैभव सांगतो, ‘आदिनाथ हा फिल्म बॅकराऊंड असलेल्या कुटुंबातून आलेला आहे. महेश कोठारे यांसारख्या प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शकांचा मुलगा आहे. तरीही तो खूप जमिनीवर आहे. त्याची ही गोष्ट मला प्रचंड आवडते. आदिनाथशिवाय माझा भाऊ आणि माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे मित्र हे माझे खूप चांगले मित्र आहेत.’संजय जाधव यांचे हर्षदा खानविलकर, अंकुश चौधरी हे खूपच चांगले फ्रेंडस आहेत. या तिघांची मैत्री गेली १६ वर्षं आहे. या मैत्रीविषयी संजय सांगतात, ‘आभाळमाया या मालिकेच्यावेळी आमची तिघांची भेट झाली. ही मालिका आमच्या तिघांच्याही करिअरचा टर्निंग पॉईंट ठरली. या मालिकेपासून आजपर्यंत आमच्या मैत्रीत काहीही फरक पडलेला नाही. आम्ही तिघे कामात व्यग्र असल्यास आम्हाला कित्येक महिने एकमेकांना भेटायलाही मिळत नाही. पण भेटल्यानंतर आपण इतके दिवस भेटलो नाही असे आम्हाला कधीच वाटत नाही.’