Join us  

​ सर्जरीमुळे श्रीदेवींचा मृत्यू झाल्याचे सांगणा-यांवर भडकली एकता कपूर! शिरीष कुंदरने बॉलिवूडला म्हटले ‘संधीसाधू’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 6:40 AM

श्रीदेवी यांचा नैसर्गिक सौंदर्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी सुंदर दिसण्यासाठी कायम सौंदर्य शस्त्रक्रियांचा आधार घेतला आणि हेच त्यांच्या मृत्यूचे ...

श्रीदेवी यांचा नैसर्गिक सौंदर्यावर विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी सुंदर दिसण्यासाठी कायम सौंदर्य शस्त्रक्रियांचा आधार घेतला आणि हेच त्यांच्या मृत्यूचे कारण ठरले, अशा चर्चांना सध्या ऊत आला आहे. या चर्चांना खतपाणी देणा-यांना एकता कपूरने अगदी परखड शब्दांत प्रत्युत्तर देत, या असल्या अफवा थांबवण्याचे बजावले आहे.विकृत विचार करणा-यांना मी सांगू इच्छिते की, हृदयासंदर्भात कुठलीही तक्रार नसणा-या लोकांनाही हृदय विकाराचा धक्का येऊ शकतो. माझ्या डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, असे प्रमाण १ टक्का असते. शेवटी मृत्यू हा विधीलिखीत आहे. खोट्या अफवांमध्ये त्यामुळेच काहीही तथ्य नाही, असे टिष्ट्वट एकताने केले आहे. चिरतरूण दिसण्यासाठी श्रीदेवी मोठ्या प्रमाणात अ‍ॅन्टी एजिंग औषधे घेत होत्या. सुंदर दिसण्यासाठी त्यांनी सुमारे २९ शस्त्रक्रिया केल्या होत्या. यापैकी एक शस्त्रक्रिया योग्यप्रकारे झाली नव्हती. यामुळे श्रीदेवींना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. साऊथ कॅलिफोर्नियाच्या एका कॉस्मेटिक सर्जनच्या देखदेखीखाली श्रीदेवी या समस्या दूर करण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून औषधे घेत होत्या. याशिवाय त्या ‘डाएट पिल्स’वरही होत्या. या डाएट पिल्समुळे त्यांच्या हृदयाला नुकसान होत होते. पोटावरची चरबी कमी करण्यासाठीही श्रीदेवींनी ट्रिटमेंट घेतली होती. चेहरा तरूण दिसावा यासाठी बोटाक्सचा वापर त्या करत होत्या. मृत्यूच्या अगदी महिनाभराआधी श्रीदेवींनी लिप सर्जरी केल्याच्या बातम्या आल्या होत्या. याच्या पुराव्यादाखल त्यांचे काही ताजे फोटो व्हायरल झाले होते. यात श्रीदेवींचे ओठ सुजलेले दिसत होते. नेहमीप्रमाणे श्रीदेवींनी सर्जरी केल्याचा इन्कार केला होता. या अनेक शस्त्रक्रिया आणि डाएट पिल्सचा मारा हेच कदाचित श्रीदेवींच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याची सध्या चर्चा आहे.ALSO READ : श्रीदेवींच्या व्यक्तिगत आयुष्यातील एक सत्य होतेय व्हायरल; वाचून तुम्हाला धक्का बसेल!शिरीष कुंदरने बॉलिवूडला म्हटले ‘संधीसाधू’दिर्ग्शक आणि कोरिओग्राफर फराह खान हिचा पती शिरीष कुंदर यानेही श्रीदेवींच्या निधनानंतर सोशल मीडियावर पडणा-या पोस्टवर एक परखड टिष्ट्वट केले आहे. श्रीदेवीसोबतचे फोटो पोस्ट करून संवेदना व्यक्त करू इच्छिणा-या बॉलिवूड सेलिब्रिटींवर त्याने तीव्र ताशेरे ओढले आहेत. कुणाचेही निधन हे त्या व्यक्तिसोबतचे फोटो शेअर करण्याची संधी नाही, हे आपण समजू अशी अपेक्षा आहे, असे बोचरे टिष्ट्वट त्याने केले आहे. श्रीदेवीच्या निधनानंतर राम गोपाल वर्मा, प्रियांका चोप्रा, हृतिक रोशन, शिल्पा शेट्टी आदींनी श्रीदेवींसोबतचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या सगळ्यांना उद्देशून शिरीषने हे टिष्ट्वट केले आहे