Join us  

‘भारत’नंतर सलमान खानसोबत कधीच काम करू शकणार नाही दिशा पाटनी, हे आहे कारण!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 10:43 AM

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी सध्या ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटानंतर दिशा कधीच सलमानसोबत काम करू शकणार नाही. अर्थात हे आम्ही नाही तर स्वत: दिशाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे‘भारत’ हा सिनेमा 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान व दिशाशिवाय कतरीना कैफ, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री दिशा पाटनी सध्या ‘भारत’च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटानंतर दिशा कधीच सलमानसोबत काम करू शकणार नाही. अर्थात हे आम्ही नाही तर स्वत: दिशाचे म्हणणे आहे.होय, मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत दिशा यावर बोलली.   अली सरांनी (‘भारत’चा दिग्दर्शक अली अब्बास जफर) मला एका भूमिकेसाठी बोलवले. जी स्पेशल अपीअरन्सपेक्षा वेगळी भूमिका होती. मी कथा ऐकली आणि केवळ सलमानसोबत काम करायला मिळणार म्हणून या भूमिकेला होकार दिला. याचे कारण म्हणजे, भविष्यात पुन्हा कधी सलमानसोबत काम करायला मिळेल की नाही, हे मला ठाऊक नाही. अली सरांनी पण स्क्रिप्ट ऐकवताना मला हेच म्हटले होते, असे दिशा यावेळी म्हणाली.

असे का? याचे कारण विचारल्यावर साहजिकच आमच्यातील वयाचे अंतर असे उत्तर दिशाने दिले. ‘भारत’मध्ये मी व सलमान एकत्र आहोत. कारण चित्रपटाच्या त्या फेजमध्ये सलमान तरूण आहे. त्यामुळे आमची जोडी जमली. पुढे ही जोडी जमेल की नाही, हे मला ठाऊक नाही, असे ती म्हणाली.

लोक मला व सलमानला एकत्र पाहणार, याचा मला आनंद आहे. आमच्यातील केमिस्ट्री सुद्धा जबरदस्त आहे. ‘भारत’ माझ्यासाठी स्पेशल आहे. कारण मी असा चित्रपट केलेला नव्हता. सलमान एक अद्भूत व्यक्तिमत्त्व आहे. प्रचंड मेहनती आहे. त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळाले,असेही दिशाने सांगितले.‘भारत’ हा सिनेमा 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान व दिशाशिवाय कतरीना कैफ, तब्बू, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

टॅग्स :दिशा पाटनीसलमान खान