Join us  

राखी सावंतच्या ‘सीक्रेट मॅरेज’चा रंगला ‘ड्रामा’!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 2:40 PM

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहणारी ड्रामा क्चीन राखी सावंतबद्दल आज एक मोठी बातमी आली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.

ठळक मुद्दे2009 मध्ये राखीने नॅशनल टीव्हीवर स्वयंवर रचले होते. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राखीने वर म्हणून इलेश परूजंवालाची निवड केली होती.

आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत राहणारी ड्रामा क्चीन राखी सावंतबद्दल आज एक मोठी बातमी आली आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या.  होय, गत 28 जुलैला म्हणजे काल राखीने एका एनआरआयसोबत गुपचूप लग्नगाठ बांधल्याचे वृत्त स्पॉटबॉयने दिले आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राखीने गुपचूप लग्न केले, असा दावा या वृत्तात करण्यात आला. हे लग्न इतके सीक्रेट ठेवले गेले की, या सोहळ्याला केवळ 4-5 लोक हजर होते. लग्नाचा बोभाटा होऊ नये म्हणून, हॉटेलचा संपूर्ण हॉल बुक न करता हॉटेलच्या खोलीतच लग्नविधी पार पडला, असेही या वृत्तात म्हटले गेले.   

अर्थात हे वृत्तही नेहमीप्रमाणे ड्रामा ठरला. लग्नाचा बातम्या प्रसारित होताच राखीने लगेच याबद्दल खुलासा केला. मी गुपचूप लग्न केल्याचे वृत्त खोटे आहे. मी त्या हॉटेलमध्ये ब्राईडल फोटोशूटसाठी गेले होते. या शूटमध्ये केवळ 4-5 लोक हजर होते. यात एक एनआरआयही होता, असे तिने सांगितले. एखाद्या अभिनेत्रीच्या हातावर मेहंदी आणि भांगेत कुंकू दिसले की लगेच तिचे लग्न झाल्याच्या बातम्या येतात. एखादी अभिनेत्री रूग्णालयाबाहेर दिसली की, ती प्रेग्नंट असल्याचे म्हटले जाते. अभिनेत्रींना इतके गृहित का धरले जाते, हेच मला कळत नाही, असेही ती म्हणाली. मी 2020 मध्ये लग्न करण्याचा माझा प्लान आहे. जेव्हा केव्हा लग्न करेल, जगाला सांगून करेल, असेही ती म्हणाली.

गतवर्षी राखीने दीपक कलालसोबत लग्न करणार, अशी घोषणा करून खळबळ उडवून दिली होती. या लग्नाची पत्रिकाही तिने सोशल मीडियावर शेअर केली होती. अर्थात हा सगळा एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे नंतर स्पष्ट झाले होते.

2004 मध्ये राखीचा ‘परदेसीया’ हा व्हिडीओ हिट झाला होता. त्यावेळी अंधेरीच्या एका मुलासोबत राखीने असेच गुपचूप लग्न केल्याचे म्हटले जाते. या मुलाचे नाव अशरफ होते. पण हे लग्न केवळ 2-3 महिने टिकले होते. पुढे अशरफवर फसवणुकीचा आरोप लागला आणि तो तुरुंगात गेला होता.

यानंतर 2009 मध्ये राखीने नॅशनल टीव्हीवर स्वयंवर रचले होते. या रिअ‍ॅलिटी शोमध्ये राखीने वर म्हणून इलेश परूजंवालाची निवड केली होती. इलेशही एनआरआय होता. शिवाय श्रीमंत होता. इलेशसोबत राखीने साखरपुडाही केला होता. पण कालांतराने इलेशकडे काहीच नाही, हे कळल्यावर राखीने त्याच्यासोबतचा साखरपुडा तोडला होता.

टॅग्स :राखी सावंत