Join us  

सहा महिन्यानंतर मुंबईत परतला आयुषमान खुराणा, हाती लागला मोठा प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 4:30 PM

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा सहा महिन्यांनंतर मुंबईला परतला आहे.

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराणा सहा महिन्यांनंतर मुंबईला परतला असून, लवकरच तो नव्या प्रोजेक्टला सुरुवात करणार आहे.  गेल्या जूनच्या अखेरीस आयुषमान चंदिगडला गेला होता. कोरोना काळातही आयुषमानच्या हाती अनेक प्रोजेक्ट्स लागले. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार एक मोठा प्रोजेक्ट आयुषमानच्या हाती लागला आहे. याची पटकथा दमदार असणार आहे. विषय ऐकल्यानंतर आयुषमान त्याचा फॅन झाला. या प्रोजेक्टमध्ये त्याला भारतीय सिनेमासृष्टीतील शानदार निर्मात्यांसोबत काम करताना दिसणार आहे. अजून या प्रोजेक्टची घोषणा झालेली नाही मात्र ती लवकरच होईल अशी माहिती आहे.

"2021 मध्ये आयुषमानचे तीन सिनेमा रिलीज होणार आहेत. या  सिनेमांचा बळावर लोकांना परत थिएटरमध्ये आणण्याचा माझा मानस आहे. 'चंदीगढ करे आशिकी' आणि 'डॉक्टर जी' हे दोन सिनेमा रिलीज होणार आहे. तिसऱ्या सिनेमाबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल.  

डॉक्टर जी सिनेमाबाबत बोलायचे झाले तर या सिनेमाचे दिग्दर्शन अनुभूती कश्यप करणार आहेत. हा कॅम्पस कॉमेडी ड्रामा सिनेमा आहे, ज्यामध्ये आयुषमान डॉक्टरची भूमिका साकारणार आहे. तर  'चंदीगढ करे आशिकी'मध्ये आयुषमान आणि वाणी कपूर यांची भूमिका असलेल्या चित्रपटाची कथा उत्तर  भारतातील प्रेमकथेवर आधारीत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आयुषमान आणि वाणी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर काम करताना दिसणार आहे.

टॅग्स :आयुषमान खुराणा