Join us  

काजोल-अजयमध्ये नेहमी या गोष्टीवरून होते तू तू -मैं मैं, कारण वाचून तुम्हाला येईल हसू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 1:52 PM

अजय देवगण आणि काजोल यांच्या लग्नाला नुकतेच २२ वर्षे पूर्ण झाली आहेत.

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडींपैकी एक जोडी म्हणजे अजय देवगण आणि काजोल. या दोघांच्या लग्नाला नुकतेच २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. लग्नाला २२ वर्षे झाली असतानाही त्या दोघांमधील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. ही गोष्ट निराळी आहे की जेव्हा अजय लग्नाची तारीख विसरला होता तेव्हा काजोल त्याच्यावर खूप वैतागली होती.

अजय देवगण आणि काजोल यांच्यात चांगले बॉण्डिंग असून लग्नाच्या २२ वर्षानंतरही या दोघांचे प्रेम तरूणाईला लाजवेल असे आहे. ही गोष्ट वेगळी आहे की जेव्हा अजय देवगण लग्नाची तारीख विसरतो तेव्हा काजोल त्याला खरेखोटे ऐकवण्याची एकही संधी सोडत नाही. आपल्याला असे तेव्हा पहायला मिळाले जेव्हा रॅपिड फायर राउंडमध्ये होस्ट करण जोहरने अजयला त्याच्या लग्नाची तारीख विचारली तेव्हा त्याला त्याचे उत्तर देता आले नाही. त्यानंतर काजोल चांगलीच भडकली होती. मात्र करणने त्यावेळी परिस्थिती बरोबर सांभाळून घेतली.

अजय देवगण व काजोल यांची पहिली भेट १९९५ साली झाली होती. ‘हलचल’च्या सेटवर. अर्थात या पहिल्या भेटीत अजयला काजोल त्याला बडबडी व उद्धट वाटली होती. दुस-यांदा तर त्याला तिला भेटायचेदेखील नव्हते. विश्वास बसणार नाही यानंतर पुढचे दोन वर्षे खरोखर दोघेही एकमेकांना भेटले नाहीत. कारण त्यावेळी अजय दुस-या कोणाला तरी डेट करत होता आणि काजोलदेखील दुसऱ्या मुलासोबत रिलेशनशीपमध्ये होती. पण काही वर्षांनंतर ते भेटले आणि मग त्यांच्यात मैत्री झाली.

अजय काजोलसोबत तासन तास बसायचा आणि काजोल तिच्या नात्यातील प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सल्ला द्यायचा. काजोलचे तिच्या प्रियकरासोबत प्रेम जुळवता जुळवता अजय कधी काजोलच्या प्रेमात पडला हे त्यालाही कळले नाही. काजोलचीही वेगळी अवस्था नव्हती.

काजोल आणि अजय देवगणने २४ फेब्रुवारी, १९९९ साली लग्न केले. या दोघांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव युग तर मुलीचे नाव न्यासा आहे.

टॅग्स :काजोलअजय देवगण