Join us  

बाळाच्या जन्मानंतर विराट- अनुष्का करणार सर्वात महत्त्वाचे काम, वाचून तुम्हालाही वाटेल त्यांचा अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 6:59 PM

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी म्हटलं होते की, 'विराट आणि अनुष्काला मूल होईल तेव्हा लोकं तैमूरला विसरतील. त्यानंतर सगळ्यांच्या नजरा विराट -अनुष्काकडे वळल्या होत्या. अनेक वेळा अनुष्का प्रेग्नंट असल्याच्याही चर्चा व्हायच्या. मात्र शर्मिला टागोर यांनी सहजच बोलले हे वाक्य विराट- अनुष्कासह तंतोतंत लागू ठरले आणि काही महिन्यानंतर या कपलनेही चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती.

आजचं डिजीटल युग आहे. त्यातच कलाकार असल्याने सगळ्यांच्या नजरा त्यांच्यावरच नाहीतर त्यांच्या मुलांवरही असतात. सध्या स्टारकिडसचा जमाना आहे. अशात जन्मापासूनच काही स्टार किडसच मीडियाच्या कॅमे-यात कैद होतात. जसे जसे ते मोठे होतात तसे तसे ते जिथे जातील तिथे मीडिया त्यांना फॉलो करते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तैमूर. त्यामुळे नेहमीच त्यांचे फोटो आपण पाहात असतो. मात्र हीच गोष्ट विराट- अनुष्का टाळणार आहेत. त्यांना त्यांचे बाळ या सगळ्या गोष्टींपासून लांब राहवे अशी इच्छा आहे. 

कोणत्याही बाळाप्रमाणे बाळाचे संगोपण करणार, त्याचे फोटो काढले जातील म्हणून त्याला बाहेर जाण्यापासून  रोखू शकत नाही पण काही प्रमाणात त्याचा अतिरेक होवू नये याची काळजी नक्कीच घेतील. इतर मुलांसारखं त्यालाही जीवन जगणं गरजेचं आहे. त्याला बाहेर जाण्यापासून कुणीच रोखू शकत नाही.

 

सगळ्यांच्या नजरा तैमूर प्रमाणे नक्कीच आमच्याही बाळावर असतील तरी त्याचं बालपण जपणं ही माझी आणि विराट पालक म्हणून जबाबदारी आहे असणार आहे. शेवटी त्यांच बालपण कुणीच हिरावून घेऊ शकत नाही म्हणून पालक म्हणून त्यांनी आत्तापासून काही प्लॅनिंगही केले असल्याचे अनुष्काने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. कुटुंबासोबत जास्त वेळ घालवता यावा त्यानुसार कामाचे नियोजन करणार असल्याचे तिने म्हटले आहे.

बेगम आणि नवाब तर आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी काहीही करायला तयार असतात. त्यामुळे तैमूरच्या बाललीला नेहमीच प्रत्येकासाठी चर्चेचा विषय ठरतात. सतत प्रकाशझोतात असण-या तैमूरबाबत आजी म्हणजेच बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी म्हटलं होते की, 'विराट आणि अनुष्काला मूल होईल तेव्हा लोकं तैमूरला विसरतील.

 

त्यानंतर सगळ्यांच्या नजरा विराट -अनुष्काकडे वळल्या होत्या. अनेक वेळा अनुष्का प्रेग्नंट असल्याच्याही चर्चा व्हायच्या. मात्र शर्मिला टागोर यांनी सहजच बोलले हे वाक्य विराट- अनुष्कासह तंतोतंत लागू ठरले आणि काही महिन्यानंतर या कपलनेही चाहत्यांना 'गुड न्यूज' दिली होती. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहली